Friday, July 31, 2015

: फळांमध्ये वेगवेगळे गुण आहेत. फळांमुळे फक्त उर्जाचं मिळत नाही तर फळे शरिराला फिट ठेवण्याचे कामही करतात. आजारी माणसाठी फळे खूपचं मदतगार आहेत. रोज फळांचे सेवन करणे फारचं फायदेशीर आहे. सगळ्या फळांमधून केळी सगळ्यात जास्त उर्जा वाढवतात. केळ्यात प्राकृतिकरित्या तीन प्रकारचे साखर मिळतात - सुक्रोज, फ्रक्टोज आणि ग्लुकोज. केळ्यात विटॅमिन ए तसेच विटॅमिन बी चे प्रमाण अधिक प्रमाणात असते. याशिवाय केळ हे उर्जेचे सगळात मोठे स्त्रोत समजले जाते. केळ्यात कॅलेरीज ची मात्रा मोठ्या प्रमाणात आढळते आणि शरिराला कुठल्याही कमजोरीपासून वाचवते. जर तुम्ही दिवसभराच्या धावपळीनंतर दमला असाल तर लगेच एक केळ खा त्यामुळे रक्तात ग्लुकोजचे प्रमाण वाढून शक्ती वाढेल तसेच उत्साह येईल. केळ्यात पोटेशियमची मात्रा अधिक असते आणि सोडियमची मात्रा खूपचं कमी आहे यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. केळ्यामध्ये आम्ल तसेच अॅसिडिटी पासून वाचवण्यासाठी खूप प्रकारचे तत्व आहेत. केळ्यात फायबरचे प्रमाण खूप आहे यामुळे पाचन क्रिया मजबूत होते.

News [01/08 7:15 am] Rautp.blogspot.in: 1 ऑगस्ट हाच खरा "मराठी राजभाषा दिन" काय मित्र-मैत्रिणीनो आता तुम्हीच एक माणुस म्हणून सांगा खरां मराठी दिन कोणता ?? प्रिय मित्र-मैत्रिणीनो "१ ऑगष्ट" हा दिवस म्हणजे "साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे" यांचा जन्मदिन. काही विशिष्ट जातीला कायम वरचे स्थान देण्यासाठी. एका पक्षाच्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याने वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 'मराठी भाषादिन' म्हणून जाहीर केला आणि तेव्हा पासून महाराष्ट्रातील मनुवाद्यानी 'मराठी दिनाचा' पुळका येवू लागला. जेमतेम १७ पुस्तके लिहिणारे कुसुमाग्रज आणि नुसत्या कादंबरीची संख्या ३५ असणारे "साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे" यांची तुलनाच होऊ शकत का??? तेव्हा उठा... जागे व्हा मित्र-मैत्रिणीनो... लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना- १६ ऑगस्ट १९४७ ला अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईत मोर्चा काढला. तथाकथित स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवसी हा या स्वातंत्र्याच्या विरोधातील मोर्चा होता.कम्युनिस्ट पक्षात अण्णाभाऊ कार्य करीत होते. हजारो लोकांच्या उपस्थितीत तो मोर्चा झाला. या मोर्चातील प्रमुख घोषणा होती... ये आझादी झुटी है, देश की जनता भुकी है !! १ मार्च १९४८ ला प्यारीसला जागतिक साहित्य परिषद झाली. या परिषदेचे निमंत्रण अण्णाभाऊ साठे यांना मिळाले होते परंतु जाण्यासाठी केवळ पैसे नसल्यामुळे ते या परिषेदेला जाऊ शकले नाहीत. २ मार्च १९७८ रोजी पहिले दलित साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून अण्णा भाऊ साठे होते. यात त्यांनी उद्घाटकीय भाषण केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी वरून निघालेले चित्रपट- १ वैजयंता ‘ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘ वैजयंता ‘ साल - १९६१ कंपनी - रेखा फिल्म्स २ ‘ आवडी’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘टिळा लावते मी रक्ताचा’ साल –१९६९ कंपनी-चित्र ज्योत ३ ‘माकडीचा माळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘डोंगरची मेना’ साल - १९६९ कंपनी - विलास चित्र ४ ‘चिखलातील कमळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘मुरली मल्हारी रायाची’ साल-१९६९ कंपनी -रसिक चित्र ५ ’वारणेचा वाघ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘वारणेचा वाघ’ साल - १९७० कंपनी - नवदिप चित्र ६ ’ अलगूज’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘अशी ही सातार्याची तर्हा’ साल - १९७४ कंपनी - श्रीपाद चित्र ७ ’ फकिरा’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘फकिरा’ कंपनी – चित्रनिकेतन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबऱ्या- प्रकाशक – १) विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे २) चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर-२. १ आग २ आघात ३ अहंकार ४ अग्निदिव्य ५ कुरूप ६ चित्रा ७ फुलपाखरू ८ वारणेच्या खोऱ्यात ९ रत्ना १० रानबोका ११ रुपा १२ संघर्ष १३ तास १४ गुलाम १५ डोळे मोडीत राधा चाले १६ ठासलेल्या बंदुका १७ जिवंत काडतूस १८ चंदन १९ मूर्ती २० मंगला २१ मथुरा २२ मास्तर २३ चिखलातील कमळ २४ अलगुज २५ रानगंगा २६ माकाडीचा माळ २७ कवड्याचे कणीस २८ वैयजंता २९ धुंद रानफुलांचा ३० आवडी ३१ वारणेचा वाघ ३२ फकिरा ३३ वैर ३४ पाझर ३५ सरसोबत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित नाटकाची पुस्तके- प्रकाशक - विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे १ बरबाद्या कंजारी २ चिरानगरची ३ निखारा ४ नवती ५ पिसाळलेला माणूस ६ आबी दुसरी आवृत्ती ७ फरारी ८ भानामती ९ लाडी दुसरी आवृत्ती १० कृष्णा काठच्या कथा ११ खुळवाडी १२ गजाआड पाचवी आवृत्ती १३ गुऱ्हाळ अण्णाभाऊ साठे यांचे शाहिरीचे पुस्तक- शाहीर दुसरी आवृत्ती १९८५, मनोविकास प्रकाशन मुंबई अण्णाभाऊ साठे यांचे प्रवास वर्णन पुस्तक- माझा रशियाचा प्रवास - सुरेश प्रकाशन पुणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित वगनाट्ये (तमाश्याची ) पुस्तके- १ अकलेची गोष्ट २ खापऱ्या चोर ३ कलंत्री ४ बेकायदेशीर ५ शेटजीचं इलेक्शन ६ पुढारी मिळाला ७ माझी मुंबई ८ देशभक्त घोटाळे ९ दुष्काळात तेरावा १० निवडणुकीतील घोटाळे ११ लोकमंत्र्याचा दौरा १२ पेंद्याचं लगीन १३ मूक निवडणूक १४ बिलंदर बुडवे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित प्रसिद्ध पोवाडे- १ नानकीन नगरापुढे २ स्टलिनग्राडचा पोवाडा ३ बर्लिनचा पोवाडा ४ बंगालची हाक ५ पंजाब- दिल्लीचा दंगा ६ तेलंगणाचा संग्राम ७ महाराष्ट्राची परंपरा ८ अमरनेरचे अमर हुतात्मे ९ मुंबईचा कामगार १० काळ्या बाजाराचा पोवाडा "हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी-श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे". अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते. ते जवळ जाऊन पाहा. मग लिहा. कारण 'जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे' हे तुकारामाचे म्हणणे खोटे नाही. म्हणून बहुजनांविषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्याच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस , हे जग तुझ्या हातावर आहे, याची जाणीव करून घ्याव [01/08 7:18 am] Rautp.blogspot.in: Educational News शैक्षणिक बातम्या - राज्यात पंधरा टक्के शाळांमध्येच बायोमेट्रिक! मंगेश दाढे, नागपूर राज्यातील पंधरा टक्के सरकारी शाळांमध्येच बायोमेट्रिक्स मशिन लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विनापरवानगी दांडी मारणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर लगाम कसा लावणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. २०१० मध्ये प्रत्येक शाळेत बायोमेट्रिक्स लावण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. साडेचार वर्षांत राज्यातील ४६ टक्के अनुदानित शाळांमध्ये बायोमेट्रिक्स मशिन लावण्यात आले. मात्र, सरकारी शाळांना सक्ती केल्यानंतरही डोळेझाक करण्यात आली. राज्यात ७५ हजार प्राथमिक आणि १९ हजार ६०० माध्यमिक शाळा आहेत. प्राथमिक शाळा ही दर एक किलोमीटर, तर माध्यमिक शाळा दर तीन किलोमीटर अंतरावर असावी, असा उल्लेख मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यात केला आहे. तरीपण, राज्य सरकारने यावर गांभीर्याने पावले न उचलल्यामुळे काही संस्थांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिका निकाली काढताना न्यायालयाने या कायद्यानुसार शाळा असायला हवी, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर काही शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी रजेवर जात असल्याचा अर्ज वरिष्ठांकडे सादर करीत नाही. विनापरवानगी रजा घेऊन शाळेत अनुपस्थित राहतात. त्याचा परिणाम अभ्यासक्रमावर होतो. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. राज्यात १५ टक्के शाळांमध्ये बायोमेट्रिक्स मशिन नाही, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यासंदर्भातील अहवाल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला प्राप्त झाला. या मंत्रालयाने राज्यातील किती शाळांमध्ये अजूनही बायोमेट्रिक्स नाही, याबाबत माहिती मागितली आहे. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी सचिवस्तरावर एक बैठक झाली. येत्या मार्चपर्यंत सक्तीने बाय� [01/08 7:18 am] Rautp.blogspot.in: Educational News शैक्षणिक बातम्या - रात्रशाळांसाठी चांगले शिक्षक म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई रात्रशाळांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी या शाळांना चांगले शिक्षक उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. शिक्षक आमदार नागो गाणार यांनी राज्यातील रात्रशाळांना पूर्णवेळ शाळांचा दर्जा देण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 'रात्र शाळांमध्ये पाठ्यक्रम, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रमही सारखा असताना सरकारने या रात्रशाळा आणि रात्र कनिष्ठ महाविद्यालयांना पूर्ण शाळा-महाविद्यालयांचा दर्जा द्यावा,' अशी मागणी त्यांनी केली. त्याला उत्तर देताना तावडे म्हणाले, 'रात्र शाळांना अनुभवी तज्ज्ञ शिक्षक देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तज्ज्ञ शिक्षक कसे मिळतील याबाबत कार्यवाही केली जाईल.' पालिका शाळांच्या खोल्या परत मिळणार 'मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये ज्या संस्थांनी अनेक खोल्या बळकावल्या आहेत. त्यापैकी ज्या संस्था शिक्षण, ग्रंथालय अशी समाजहिताची काम करत असतील अशा संस्थांना अभय मिळेल. मात्र लाभाच्या इतर कामासाठी शाळांच्या खोल्यांचा वापर होत असलेल्या निर्दशनास आल्यास अशा संस्थावर मात्र कारवाई केली जाईल,' असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 2 hrs · Educational News [01/08 7:19 am] Rautp.blogspot.in: Educational News शैक्षणिक बातम्या - ‘भटक्या’ मुलांना शैक्षणिक हमी यामिनी सप्रे, मुंबई भटक्या समाजाच्या उद्योग फिरस्तीमुळे त्यांना सतत वेगळ्या ठिकाणी जावे लागते. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसे आणावे याबाबत आजवर ऊहापोह सुरू होता. तसेच या वर्गातील मुले शाळाबाह्य होण्याचे राज्यातील प्रमाण मोठे आहे. हीच बाब लक्षात घेऊन या मुलांच्या शैक्षणिक कारकिर्दीची एकत्रित माहिती साठवणारे आणि या मुलांच्या शिक्षणात सलगता आणणारे एज्युकेशनल गॅरंटी कार्ड विद्यार्थ्यांना देण्याचे सरकारने निश्चित केले असून, लवकरच त्याबाबतचा सरकारी निर्णय जारी करण्यात येणार आहे. राज्यातील शिक्षणाच्या दृष्टीने दुर्लक्षित असलेल्या आणि शिक्षणाधिकार कायद्यात समावेश होणाऱ्या मुलांच्या शिक्षणातील अडचणींबाबत विचार करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला राज्यातील १८ जिल्ह्यांतील २६ स्वयंसेवी संस्थांचे ४७ प्रतिनिधी, शिक्षण, आदिवासी विकास व समाज कल्याण विभागाचे १५ राज्यस्तरीय व विभागस्तरीय शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार व शिक्षण आयुक्त भापकर उपस्थित होते. मुले शाळादाखल झाली तो दिवस, त्यांची शैक्षणिक प्रगती, विषय, सध्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा फोन नंबर आणि नव्या शाळेतील मुख्याध्यापकांचा नंबर आदी तपशील या कार्डमध्ये असेल. हे कार्ड विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात येणार असून, या कार्डाच्या आखणीची अंतिम जबाबदारी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केली जाणार आहे, असे नंदकुमार यांनी सांगितले. सुरुवातीला भटक्या समाजातील मुलांसाठी असणाऱ्या या योजनेची व्याप्ती भविष्यात वाढवण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले. 'असर'चे चित्र पालटणार प्रथम या सामाजिक संस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या 'असर' या सर� [01/08 7:19 am] Rautp.blogspot.in: Educational News शैक्षणिक बातम्या - "सर्व शिक्षा'चे कर्मचारी कंत्राटीच राहणार - - सकाळ वृत्तसेवा शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 12:00 AM IST Tags: sarva shiksha abhiyan, mumbai मुंबई - राज्यात मागील दहा ते बारा वर्षांपासून "सर्व शिक्षा अभियाना‘च्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यास शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट नकार दिला. शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी "सर्व शिक्षा अभियाना‘च्या अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर मागील दहा ते बारा वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. 3 hrs · Educational News [01/08 7:20 am] Rautp.blogspot.in: Educational News शैक्षणिक बातम्या - बीसी शिष्यवृत्तीसाठी 220 कोटींची तरतूद - - सकाळ वृत्तसेवा शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 12:00 AM IST Tags: ebc scholarship , mumbai मुंबई - राज्यातील खासगी विनाअनुदानित संस्थेत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना "ईबीसी‘ शिष्यवृत्तीचे वाटप करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाकरिता 220 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. गतवर्षी या शिष्यवृत्तीच्या रकमेपैकी मिळालेल्या 33 कोटी 17 लाखांचे वाटप करण्यात आले आहे. काही संस्थाचालकांकडून थकीत शिष्यवृत्तीची मागणी केली जात आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली. 3 hrs

Aug 01, 2015 भारतातील मोबाइल सेवा सुरू होऊन कालच्या ३१ जुलै रोजी २० वर्षे पूर्ण झाली. किमान निम्मे भारतीय आता मोबाइलधारक आहेत.. ते सतत कुणाशी तरी संपर्क साधण्यासाठी वा स्वत:त रममाण होण्यासाठी मोबाइल वापरत आहेत आणि त्यांच्यावर सव्‍‌र्हरांची नजर असणेही आता अंगवळणी पडले आहे! मोबाइल फोन नव्हता तेव्हा माणसे एकमेकांशी बोलत तरी कशी असतील असा नवलप्रश्न पडणारी पिढी केव्हाच जन्माला आलेली आहे. त्याआधीची ते जाड काळे दूरध्वनी संच अनुभवलेली, चार दिवसांचा पाहुणा म्हणून येऊन गेलेला पेजर नावाचा निरोप्या पाहिलेली पिढी अधूनमधून स्मरणरंजनात रमताना दिसते, की तेव्हा कुठे बाहेर फोन करायचा तर ट्रंक कॉल बुक करून कशी चारचार तास वाट वगरे पाहायला लागायची. हे सर्व पाहिले की कोणासही वाटावे की भारतात हे मोबाइलनामक इटुकले यंत्र आणि प्रचंड तंत्र येऊन बराच काळ लोटला असेल. तर ते आहेच. काळ सापेक्ष असतो आणि आजच्या तंत्रयुगात तर दोन वर्षांत पिढीबदल होतो म्हणतात. पण आपल्या नेहमीच्या दिनदíशकेनुसार हिशेब लावला तर लक्षात येईल, की आज आपल्या सवयीची झालेली मोबाइल क्रांती अजून कोवळीच आहे. काल, ३१ जुललाच तिचा विसावा वाढदिवस झाला. आज भारतातील मोबाइल एकविशीत आला. ज्या कोलकात्यातून १६४ वर्षांपूर्वी पहिली तार पाठविण्यात आली होती त्याच कोलकात्यातून ३१ जुल १९९५ रोजी पहिला मोबाइल कॉल लावण्यात आला, ही घटना ऐतिहासिक योगायोगाची. त्या योगायोगाला आणखी एक वेगळी जोड आहे. ती म्हणजे हा कॉल केला होता एका साम्यवादी नेत्याने. ज्योती बसू यांनी. ते तेव्हा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. मोबाइलचे जाळे देशात पहिल्यांदा कोठे अंथरले जाईल तर ते कोलकात्यामध्येच, हा त्यांचा हट्टाग्रह होता. ते सुरू झाले तेव्हा त्यांनी रायटर्स बििल्डगमधून तेव्हाचे केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांना पहिला मोबाइल फोन केला. आज ज्योती बसू आपल्यात नाहीत. सुखराम हे अन्य एक दूरसंचारमंत्री ए राजा यांच्यासमवेत तिहार तुरुंगात आहेत. वेगळ्या अर्थाने, संपर्कक्रांतीने देशात आणलेल्या समृद्धीला लागलेली ही कटू फळेच. पण तेव्हा सुरू झालेले ते दळणवळण आज अशा टप्प्यावर आले आहे की त्यास वगळून जगण्याची कल्पना करणेही कठीण वाटावे. देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाइल फोन-संख्या शंभर कोटी, अशी सद्य:स्थिती आहे. अनेकांकडे दोन मोबाइल असतील, असे जरी मानले तरी किमान निम्म्या भारतीय लोकसंख्येच्या हातात मोबाइल फोन आणि मुठीत दुनिया आहे. किमान जग आपल्या कवेत आल्याची भावना तरी आहे. ती किती खरी आणि किती भ्रामक हा वेगळा प्रश्न. परंतु या संपर्क साधनाने येथील नागरिकांना माहितीनामक अस्त्र सहज उपलब्ध होईल, अशी परिस्थिती तर नक्कीच निर्माण केली आहे. याचे कारण या यंत्रामागे असलेल्या तंत्रात आहे. दिवसेंदिवस ते अत्याधुनिक होत चालले आहे. त्याने माणसे एका बटणाच्या अंतरावर आणली हे खरेच. खरे तर आज हे कमी झालेले अंतरही अनेकांच्या अंगावर येत आहे. त्याने माणसामाणसांतील भौगोलिक अवकाश मिटवला. परंतु मोबाइल हे केवळ एकमेकांशी बोलण्याचे साधन नाही. कालिदासाचे शब्द उसने घेऊन सांगायचे तर ती इटुकली यंत्रपेटी आज आपली सचिव आणि सखी बनलेली आहे. शरीराच्या एखाद्या अवयवाप्रमाणेच ती सवयीची बनली आहे. तिच्यावरचे आपले अवलंबित्व वाढतच चालले आहे. एवढे की विजेरी संपून मोबाइल बंद पडताच माणसे जगण्याचे श्रेयस हरपल्यासारखी हवालदिल होताना दिसतात. पाहू तेव्हा लोक मोबाइलच्या पडद्यात नजरा थिजवून बसलेले असतात. मोबाइलमध्ये गाणी भरून देण्याचे व्यवसाय गावोगाव चालतात आणि या मोबाइलपुरताच विजयानंद देणाऱ्या खेळांची सर्वत्र चलती असते. याहून महत्त्वाचे म्हणजे माणसे सतत कोणाशी ना कोणाशी बोलतच असतात. कधी थेट, तर कधी लिहून. एकमेकांबरोबर सतत बोलण्याची, एकमेकांच्या दुरून संपर्कात राहण्याची आवश्यकता माणसाला भासते ती केवळ हाती हे साधन आहे म्हणून की ती त्याची उपजतच निकड आहे याचा शोध मानवी वर्तनाच्या अभ्यासकांनी जरूर घ्यावा. एक मात्र खरे की मोबाइलने भारतीयांना पूर्णत: कहय़ात घेतले आहे. मदतीच्या मिषाने आलेला हा उंट मानवी अस्तित्वाचा तंबूच जणू बळकावून बसला आहे. हे चांगले की वाईट? हा शाप की वरदान? कदाचित यापुढील शाळकरी निबंधांचा हाही एक विषय ठरेल. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की या साधनाने असा विचार करण्याचा अवकाशही माणसांजवळ ठेवलेला नाही. याचे कारण, आपल्या हे लक्षात येत नाही, परंतु मोबाइल फोनने मानवी जीवनास एका वेगवान आवर्तात ढकलून दिले आहे. वेग हे आजच्या माहिती आणि तंत्रज्ञान युगाचे अनन्यसाधारण वैशिष्टय़ आहे. ‘बस दो मिनट’ हे या जमान्याचे घोषवाक्य आहे. पूर्वीचे अक्कलशून्य दूरध्वनी संच तेथे टिकणे शक्यच नव्हते. त्यांची जागा आजच्या स्मार्टफोनने घेतली आहे. वेगवान संपर्क, झटपट माहिती पुरवठा, तत्काळ विविध सेवा देणारी आणि म्हणूनच व्यक्तीला कालानुरूप असण्याचा विश्वास देणारी ही यंत्रे तिला एकाच वेळी सबल करीत आहेत आणि त्याच वेळी त्याला एका अवकाशव्यापी व्यूहाच्या - मॅट्रिक्सच्या कडीमध्ये अडकून टाकीत आहेत. माणूस आज वेगळा राहूच शकत नाही. तो एकटा राहू शकत नाही. आभाळाच्या पलीकडील ध्रुवीय उपग्रहांपासून मोबाइल मनोऱ्यांपर्यंत आणि मोबाइलमधील सिम कार्डापासून संगणकांच्या महाकाय सव्‍‌र्हपर्यंत सगळेच त्याच्यावर नजर ठेवून आहेत. त्यातून सुटायचे म्हटले तरी अवघड आहे. खासगी अवकाशाचा विनाश की जगात टिकण्यासाठी आवश्यक असलेली माहिती असे दोनच पर्याय त्याच्यासमोर आहेत. बहुसंख्यांना त्या खासगी अवकाशाची निकडच भासेनाशी झाल्यामुळे त्यांची निवड माहिती, संपर्क आणि सेवा हीच आहे. मोबाइलचे जाळे पसरण्यामागील महत्त्वाचे कारण हे आहे. मोबाइल संपर्क यंत्रणेची दुसरी-तिसरी पिढी आपण आज अनुभवत आहोत. चौथी आपल्या दारावर येऊन उभी आहे. वेग वाढतोच आहे. माहिती, सेवा, संपर्क आणि मनोरंजन धबाबा आदळत आहे. त्याचे दृश्य परिणाम मोठे मौजेचे आहेत हे खरेच. परंतु या सर्वातून एकाच मापाचे वैचारिक आणि भावनिक साचे निर्माण होत चालले आहेत. मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅप वा तत्सम संदेशवाहक अ‍ॅप्समधून होत असलेले दळणवळण हा त्याचा भयावह पुरावा आहे. त्या संदेशांचा गदारोळ एवढा असतो की त्यातील माहिती तपासून पाहणे, त्यावर शांतचित्ताने विचार करणे याची उसंतही कोणास मिळत नाही. माणसे सतत आलेला संदेश पुढे पाठविण्याच्या गडबडीत. आजचा सामाजिक चिडचिडेपणा हा माणसाच्या हरवलेल्या अवकाशाचा आणि गमावलेल्या उसंतीचा परिणाम आहे, हे नीट ध्यानी घेतले पाहिजे. अवघ्या २० वर्षांत मोबाइलने देशाच्या सामाजिक व्यवस्थेत हे बदल घडवून आणले आहेत. जगण्याचे िरगटोन बदलले आहेत. अर्थात ज्या देशात संपर्काची एसटी वा रस्त्यासारखी साधने अद्यापही अनेकांच्या आवाक्यात नसतात त्या देशात जर मोबाइल स्वस्तात उपलब्ध होत असेल तर तो पसरणारच यात काही कौतुक नाही. त्यातून काही बाबतीत झालीच तर प्रगती होईल, परंतु ते प्रगतीचे साधन मानण्यात फारसा अर्थ नाही. तसाही तो अगदी शंभर कोटी लोकांच्या हातांत असला तरी लहानच आहे. तो जसजसा मोठा होत जाईल तसतसे त्याचे परिणाम आणखीही दृग्गोचर होतील. मात्र ते काहीही असले, तरी आता त्यापासून सुटका नाही. त्याला दरवर्षी ३१ जुलला वाढदिवसाच्या हार्दकि शुभेच्छांचा एसेमेस पाठविणे एवढेच आता आपल्या हाती उरलेले आहे
कळण्याची दृश्य-वळणे Aug 01, 2015 महेंद्र दामले चित्रातली प्रतिमा कुठचीही असो ती एकच कार्य करते! आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाहिलं, पाहात आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स्थिती काय आहे! याच कारणाने आपले सर्व देव मानवरूपात आपल्याला सामोरे असतात. भारतात कुठच्याही धर्माच्या दृष्टीने पवित्र, प्रार्थनीय स्थळाकडे जा! तेथील वास्तूमध्ये जा, त्या वास्तूच्या केंद्रभागाला खूप महत्त्व असते. त्या केंद्रभागात, धर्मानुसार महत्त्वाची, पवित्र, दर्शन घ्यावी, पूजनीय अशी एखादी वस्तू असते. त्या वस्तूसमोर येऊन तिला पाहणं, तसंच त्या वस्तूभोवती प्रदक्षिणा घालणं याकरता जागा तयार केलेली असते. पवित्र वस्तूसमोर येऊन तिला पाहणं याला धार्मिक परिभाषेत ‘दर्शन’ म्हणतात. रोज किंवा काही दिवसांच्या अंतराने ‘दर्शन’ घेण्याला धर्मात महत्त्व असतं. अशा सवयींना सांस्कृतिक महत्त्व असतं. अशा सवयी असणाऱ्या लोकांना विचारा की, या पवित्र वस्तूचं दर्शन समोरून मिळालं नाही, कडेनं मिळालं तर चालतं का? काय वाटतं? बहुतेक जण हेच उत्तर देतील की, दर्शनाचं, पाहण्याचं समाधान मिळत नाही. त्यामुळे कितीही गर्दी असो, पवित्र, प्रार्थनीय वस्तूला समोरूनच पाहायचंय, ‘सामोरं’ जायचंय. अशा प्रकारे महत्त्वाचा अनुभव, (धार्मिक स्वरूपाचा) ‘सामोरं’ जाऊन घेणं याला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे. ते महत्त्व अधोरेखित करणारी एक घटना-कथा आपण पाहू या. कर्नाटकात १६व्या शतकात श्री वादीराजा राज्य करत होते. त्यांच्या राज्यात उडुपी गावी श्रीकृष्णाचं अतिप्राचीन मंदिर होतं; आहे. श्री मध्वाचार्याचा संबंध असलेलं ते अतिशय पावन मानलं जाणारं मंदिर आहे. ‘कनकदास’ हे संत, त्यांच्या कृष्णभक्तीबद्दल प्रसिद्ध होते. ते एकदा उडुपी येथे आले. पण त्या काळातील सामाजिक चालीरीतींनुसार, त्यांच्या जातीमुळे त्यांना श्रीकृष्ण मंदिरात प्रवेश नव्हता. पण त्यांची भक्ती इतकी प्रसिद्ध होती की, वादीराजांनी त्यांना मंदिराच्या मागच्या बाजूला एक कुटी बांधून दिली. कनकदास रोज आपला तंबोरा घेऊन भजनं म्हणत. त्यांच्या व त्यांच्या प्रिय कृष्णामध्ये भिंत होती. परिणामी कनकदास आपल्या अंतर्मनात कृष्णाचं दर्शन घेत असं मानलं जातं. एके रात्री भूकंप झाला. मंदिराच्या भिंतीला भेग, भगदाड पडलं. त्यातून कनकदास कृष्ण मंदिर, मूर्ती पाहू शकले. वादीराजांनी या घटनेला एक संकेत म्हणून पाहिले. भिंतीचं भगदाड भरून काढण्याऐवजी तिथे एक खिडकी बांधली. ज्यातून कनकदास प्रिय श्रीकृष्णाचं दर्शन घेऊ शकले. वादीराजांनी अशी प्रथा पाडली की ते स्वत:ही जेव्हा या मंदिरात यायचे तेव्हा सर्वप्रथम या खिडकीतून श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन मग मंदिरात प्रवेश करायचे. त्यानंतर सर्व पीठांच्या अधिकाऱ्यांसह, सर्व भक्त ही प्रथा आजही पाळतात. कनकदासांसाठी बनवलेल्या खिडकीतून, ‘कनकनदिंडी’तून दर्शन घेतात. सामोरं जाणं, दर्शन घेणं याचं महत्त्व अधोरेखित करणारा मुद्दा सांगणारा तपशील असा की हिंदू मंदिरात मूर्ती नेहमी पूर्व दिशेला तोंड करून, ‘पूर्वाभिमुख’ असते तशीच ती उडिपी मंदिरातही होती, पण कनकदासांसाठी श्रीकृष्ण या खिडकीकडे तोंड करून उभे राहिले. पूर्वेकडे पाठ करून मूर्ती ‘पश्चिमाभिमुख’ झाली. आजही आहे. ज्यामुळे कनकदास श्रीकृष्णाचं ‘दर्शन’ सामोरं जाऊन, समोरून घेऊ शकले. यावरून आपल्या संस्कृतीत सामोरं जाऊन दर्शन घेणं, पाहणं याचं महत्त्व किती आहे ते स्पष्ट होईल. वस्तू समोरून पाहिल्यामुळे काय होतं? समोरून पाहण्याचं नक्की काय महत्त्व आहे? आपल्या सभोवतालच्या जगात वस्तू अस्तित्वात आहेत हे आपल्याला ‘माहीत’ असतं. आपण जेव्हा एखादी वस्तू आपल्यासमोर आणतो तेव्हा ती वस्तू व आपण यात वेगळ्या पातळीवर देवाण-घेवाण सुरू होते. आपण एखादी वस्तू आपल्या हातात घेऊन किंवा समोर ठेवून बघू लागतो, तेव्हा त्या वस्तूचं आपण माहितीमधून अनुभवात रूपांतर करतो. त्याचा रंग, आकार, आकारमान, पोत, स्पर्श, गंध, वजन, त्याच्यावरचा छायाप्रकाशाचा परिणाम, त्याला हाताळल्यावर निर्माण होणारा ध्वनी, तापमान अशा गोष्टींचा अनुभव आपण घेऊ लागतो. हा अनुभव अनेक संवेदनांनी युक्त असल्याने अनुभव घेण्याचा कालावधी खूप असतो; असू शकतो. काही काळ आपण फक्त अनुभव घेत राहतो. त्याबद्दल मतं बनवत नाही; बनवू शकत नाही. अशा प्रकारे अनुभव घेताना आपल्या मनात काही भावनाही निर्माण होतात. या सर्व अनुभवाची प्रक्रिया प्रत्यक्षात, वर्तमानकाळात होत असते. एकाअर्थी तो अनुभव 'लाइव्ह' असतो. समोरून वस्तू पाहण्याची प्रक्रिया आपणाला वर्तमानकाळात, प्रत्यक्षात घेऊन येते. अनुभव घेण्याच्या अवस्थेत आपण राहतो. जेव्हा वस्तू आपल्या समोरून निघून जाते, बाजूला सरते तेव्हा ती वर्तमानकाळातील ‘अनुभवातून’ भूतकाळातील ‘माहिती’मध्ये रूपांतरित होते. माहिती आपल्याला भूतकाळात ज्ञात झालेली असते, म्हणूनच आपण बोलताना म्हणतो, ‘माहिती आहे!’ म्हणजेच पूर्वी, अगोदरच, भूतकाळात माहिती झाले आहे. वस्तू समोर ठेवून वर्तमानकाळात पाहताना आपले डोळे व मेंदू, वर उल्लेखिलेल्या संवेदनांचे, सपाट नकाशाप्रमाणे असलेले संवेदनापट बनवत असतात. या संवेदनापटांना आपण ‘प्रतिमा’, दृश्य प्रतिमा असेही म्हणतो. मेंदू वस्तूच्या संवेदनानुभवांना ज्या पद्धतीने नकाशाप्रमाणे साठवतो व ते सपाट असतात, तसेच चित्र द्विमितीत असल्यामुळे, प्रतिमा या सपाट असतात. प्रतिमा सपाट झाल्यामुळे दोन गोष्टी होतात. एक म्हणजे त्या आरशाप्रमाणे काम करतात. म्हणजे आपले डोळे चेहऱ्याच्या समोरच्या बाजूला असतात. परिणामी डोळ्यासमोर, डोळ्यांच्या दृष्टिक्षेपात गोष्टी आणून, पाहून, समजून, ज्ञान घेऊन आपण कृती करतो. आपल्याला जेव्हा स्वत:चा चेहरा, शरीर याचं निरीक्षण करून ज्ञान, भान मिळवायचं असतं तेव्हा स्वत:चा चेहरा, शरीर यांना आपल्याच डोळ्यापुढे आणण्याकरिता आपण आरसा वापरतो. आरसा जरी प्रतिबिंब दर्शवत असला तरीही त्याचे मुख्य कार्य ‘भान’ निर्माण करणं आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या शरीराच्या इतक्याच मोठय़ा आरशाची गरज भासते. व्यायामशाळांत, पाश्चात्त्य शैलींच्या नृत्याच्या वर्गात प्रशिक्षक व भिंतीएवढे आरसे यांचं एकच काम असतं, भान निर्माण करणे! चित्रातली प्रतिमा कुठचीही असो ती एकच कार्य करते! आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाहिलं, पाहत आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स्थिती काय आहे! याच कारणाने आपले सर्व देव मानवरूपात आपल्याला सामोरे असतात. पंढरीच्या विठ्ठलाकडेच पाहा ना! कटेवरी हात विटेवरी उभा असं त्याचं रूप, समोरून पाहिलं की त्याच्या उभ्या राहण्यामुळे तयार झालेल्या शरीराचा आकार, त्याचा सपाट, द्विमितपणा आपल्यासमोरच थेट तयार होऊन राहतो. त्याच्यासमोर जाऊन उभं राहिलं की तो स्वत:ला आपलीच जाणीव करून देतो. आपल्यासाठी ‘आरसा’ होतो. हीच गंमत आहे. वस्तूला समोरून पाहिलं की वस्तूचं द्विमित रूप, प्रतिमा तयार होते. ती आरशाप्रमाणे कार्य करू लागते, आपल्याला आपलं भान निर्माण करून देते. आपल्यात व त्या वस्तूत एक नातं निर्माण होतं. आपणही वस्तूला समांतर होऊन जातो. या नात्यातूनच, समांतरतेतून सपाट प्रतिमेत चैतन्य दिसून येतं. विठ्ठलाच्या मूर्तीत, शेंदूर लावलेल्या शिळेत चैतन्य जाणवू लागतं. अमूर्ताची जाणीव होते. कुठचंही चित्र व विशेष करून अमूर्त चित्र, ज्याला अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग असंही म्हटलं जातं. त्यांना पाहण्यातही हीच प्रक्रिया कार्य करत असते. अमूर्त, अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग कळत नाही असा नाराजीचा सूर लावणं साहजिक आहे. आपण पुढच्या वेळेला पाहू या की, दर्शनाच्या प्रक्रियेतून ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट’ पेंटिंग ‘समजतं’, समजू शकतं का ते. Promoted

Thursday, July 30, 2015

शैक्षणिक शासन निर्णय. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे १९६८ ते आज पर्यंतचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय downloadकरण्यासाठी http://ezpschool.blogspot.in/ या ब्लॉग ला
http://ezpschool.blogspot.in/

Tuesday, July 28, 2015

मान्यता नसलेले शिक्षक तपासतात उत्तरपत्रिका - - सकाळ वृत्तसेवा बुधवार, 29 जुलै 2015 - 12:15 AM IST Tags: teacher , maharashtra , ramnath mote, mla मुंबई - राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी अनेक शिक्षकांना शिक्षण विभागाची अधिकृत मान्यता नसतानाही बोर्डाकडून केवळ परीक्षक नव्हे, तर मॉडरेटर म्हणूनही नेमण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. बोर्डाच्या या अनागोंदीविरोधात तातडीने कारवाई व्हावी, अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे. या संदर्भात आमदार मोते यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना बोर्डाच्या नियमबाह्य कारभाराविरोधात निवेदन दिले आहे. त्यात चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. राज्यात दर वर्षी लाखो विद्यार्थी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये परीक्षेला बसतात. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षकांची परीक्षक व नियामक म्हणून नियुक्ती केली जाते. साधारणतः 200 ते 250 विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षक व आठ ते 10 परीक्षकांसाठी एका नियामकाची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्देशांनुसार, विभागीय मंडळ आपल्या शाळांकडून शिक्षकांची नावे मागवतात व या शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परीक्षक म्हणून नियुक्त केले जाते. अनुभवी परीक्षकांची गरजेनुसार नियामक म्हणून नियुक्ती होते. राज्यातील अनेक शाळा बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी घेत नाहीत. अशा शाळांविरुद्ध मंडळाकडून अथवा सरकारकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. विभागीय मंडळाकडून परीक्षक व नियामक म्हणून नियुक्त्या करताना नियमबाह्य पद्धतीने काम केले जात आहे. कोणतेही निकष पाळले जात नाहीत. संबंधित शिक्षकाचा अध्यापनाचा विषय, त्याची शैक्षणिक पात्रता, अध्यापनाचा अनुभव व संबंधित शिक्षक मान्यताप्राप्त अधिकृत शिक्षक आहे किंवा नाही, याची पडताळणी केली जात नाही. ही बाब गंभीर असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारी आहे. अनेक शाळांतील शिक्षकांना शिक्षण विभागाने मान्यता दिलेली नसतानाही संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम करत आहेत. शिक्षक म्हणून मान्यता नसलेले मॉडरेटर (नियामक) म्हणूनही वर्षानुवर्षे काम करत आहेत, असा आरोप मोते यांनी निवेदनाद्वारे केला आहे. विभागीय मंडळाकडे अनेकदा तक्रार करूनही याची दाखल घेतली जात नाही. बोर्ड नियमबाह्य पद्धतीने काम करत असल्यामुळे योग्य व पात्रताधारक शिक्षकांचीच परीक्षक व नियामक म्हणून नियुक्ती व्हावी; अन्यथा बोर्डाच्या कारभाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. - रामनाथ मोते, शिक्षक आमदार

Dedicated to the Great Abdul kalam sir. Some of his own great quotes which are truly inspiring: Don’t take rest after your first victory because if you fail in second, more lips are waiting to say that your first victory was just luck.” - A.P.J Abdul Kalam “All Birds find shelter during a rain. But Eagle avoids rain by flying above the Clouds.” - A.P.J Abdul Kalam “Failure will never overtake me if my definition to succeed is strong enough”. - A.P.J Abdul Kalam “Man needs difficulties in life because they are necessary to enjoy the success.” - A.P.J Abdul Kalam “If you want to shine like a sun. First burn like a sun.” - A.P.J Abdul Kalam “It is very easy to defeat someone, but it is very hard to win someone” - A.P.J Abdul Kalam "All of us do not have equal talent. But, all of us have an equal opportunity to develop our talents.” - A.P.J Abdul Kalam " Be more dedicated to making solid achievements than in running after swift but synthetic happiness." -A.P.J Abdul Kalam "Thinking should become your capital asset, no matter whatever ups and downs you come across in your life." - A.P.J Abdul Kalam " Without your involvement you can't succeed. With your involvement you can't fail. " - A.P.J Abdul Kalam 1 hr · Public

Monday, July 27, 2015

बई माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची भाषणे प्रेरणादायी असत. यापैकी एक, कलाम यांच्या ‘इंडिया २०२०’ या पुस्तकाचा पाया ठरणारे हे भाषण.. स्वातंत्र, विकास आणि ‘जगासह-जगासाठी भारत’ अशी त्रिसूत्री देणारे.. कलाम यांचा आनंद कशात होता, हेही विस्ताराने सांगणारे.. आपला इतिहास ३००० वर्षांचा आहे. अनेक ठिकाणांहून लोक येथे आले, त्यांनी आपल्यावर राज्यही केले आणि केवळ आपली भूमी कब्जात घेण्यावर न थांबता, आपल्या मनांवरही त्यांनी ताबा मिळवला. आक्रमणांचा हा इतिहास अलेक्झांडरपासूनचा आहे. ग्रीक आले, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आणि फ्रेंच तसेच डचही येथे आले. या सर्वानी आपल्याला लुटले. जे आपले होते ते त्यांचे झाले. तरीही आपण मात्र कोणत्याही देशावर आक्रमण कधीच केलेले नाही. आपण जमिनीवर कब्जा केलेला नाही, आपण सांस्कृतिक अतिक्रमणे केली नाहीत, आपण कुणाची राष्ट्रे ध्वस्त केली नाहीत. असे का? मला वाटते, आपण इतरांच्याही स्वातंत्र्याचा आदर करणारे आहोत, म्हणून. म्हणूनच, माझे पहिले स्वप्न आहे स्वातंत्र्याचे. भारताला स्वातंत्र्याचे पहिले विराट दर्शन १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातून झाले, असा माझा विश्वास आहे. हेच ते स्वातंत्र्य, जे आपण जोपासले पाहिजे, वाढवून बुलंद केले पाहिजे. आपण स्वतंत्र नसलो, तर कोणीही आपला मान राखणार नाही. माझे दुसरे स्वप्न आहे, विकास. जवळपास ५० वर्षे आपण ‘विकसनशील देश’ म्हणून राहिलो. आता वेळ आली आहे स्वतकडे विकसित देश म्हणून पाहण्याची. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केल्यास आपला क्रमांक जगातील पहिल्या पाच देशांमध्ये लागतो. अनेक क्षेत्रांत आपल्या देशाचा वाढदर दहा टक्के आहे. आपल्याकडली गरिबीची पातळी कमी-कमी होते आहे आणि आपल्या यशाची दखल आता जगाकडूनही घेतली जाते आहे. तरीदेखील आपण स्वतला विकसित - स्वावलंबी आणि स्वतवर विश्वास असलेला देश मानण्यास कचरत असू, तर आपला आत्मविश्वास कमी पडतो आहे, हेच त्यामागचे कारण. खरे ना? माझे तिसरे स्वप्न आहे.. भारताने जगासोबत आणि जगासाठी उभे राहावे, हे. आपण जगासाठी आणि जगासोबत उभे राहिलो नाही, तर आपल्याला मान मिळणार नाही, असेही मला वाटते. स्वतमध्ये शक्ती असेल, तरच शक्तींची साथ मिळते. आपली ही शक्ती म्हणजे केवळ लष्करी बळ नव्हे. आर्थिक सामथ्र्यसुद्धा आपण वाढवले पाहिजे.. हे दोन्ही बाहू सशक्त असले पाहिजेत. माझे भाग्य असे की, मला तीन महान मनाच्या माणसांसह काम करायला मिळाले. अंतराळ विभागाचे डॉ. विक्रम साराभाई आणि त्यांच्यानंतर प्रोफेसर सतीश धवन, आणि तिसरे डॉ. ब्रह्म प्रकाश- म्हणजे भारताच्या अणुइंधनाचे शिल्पकार. मी या तिघांना अगदी जवळून पाहू शकलो, ही आयुष्यात मला मिळालेली सर्वात मोठी संधी होती, त्या अर्थाने हा केवळ माझ्या नशिबाचा भाग म्हणावा लागेल, म्हणून मी भाग्यवान. माझ्या आयुष्यात चार महत्त्वाचे टप्पे आले : पहिला : ‘इस्रो’ मधली- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतली माझी २० वर्षे. ‘एसएलव्ही-३’ या भारतीय बनावटीच्या पहिल्याच उपग्रह-वाहक यानाच्या प्रकल्पाचा प्रमुख म्हणून- म्हणजे प्रकल्प संचालक म्हणून करण्याची संधी मला मिळाली. याच यानाने ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा सोडला. ही दोन दशके माझ्या वैज्ञानिक आयुष्यात महत्त्वाची होती. दुसरा : ‘इस्रो’नंतर मी ‘डीआरडीओ’मध्ये (संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत) गेलो आणि तेथेही, क्षेपणास्त्र वाहकांवर काम करण्याची संधी मला मिळाली. ‘अग्नी’चे परीक्षण १९९४ मध्ये सफल झाले, तेव्हा मला जणू स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला होता. तिसरा: अणुऊर्जा विभाग आणि डीआरडीओ यांनी अणुचाचणीसाठी अत्यंत मोलाची भागीदारी केली, तेव्हाचा टप्पा. ११ आणि १३ मे १९९८ या दिवशी मी स्वर्गसुख तिसऱ्यांदा अनुभवले. माझ्या पथकासह माझा सहभाग या चाचणीमध्ये असल्यामुळे, भारत काय करू शकतो हे जगापुढे सिद्ध करून दाखवण्याची संधी मला मिळाली होती. आम्ही यापुढे ‘विकसनशील’ देश नसून विकसित देशांपैकी आहोत, हे भारताने सप्रमाण दाखवून दिले होते. भारतीय असल्याचा अभिमान ओसंडत होता माझ्यातून. ‘अग्नी’ क्षेपणास्त्र नुसते पुन्हा वापरता येण्याजोगे करून आम्ही थांबलो नव्हतो. त्यासाठी नवे साहित्यही आम्ही वापरले होते. हे साहित्य म्हणजे कर्ब- कार्बन, वजनाला अत्यंत हलके. चौथा : टप्पा जरा निराळा आहे. एके दिवशी हैदराबादच्या निझाम इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून अस्थिरोगतज्ज्ञ असलेले एक डॉक्टर माझ्याकडे आले. त्यांनीही, आम्ही ‘अग्नी’ साठी वापरलेले कार्बनआधारित साहित्य उचलून पाहिले, तेव्हा त्याच्या हलकेपणाने ते अचंबित झाले. तेवढय़ावर न थांबता, मला रुग्णालयात नेऊन त्यांनी काही रुग्णांशी माझी गाठ मुद्दाम घालून दिली. कितीतरी लहानलहान मुले होती तिथे. त्यांच्या पायांत धातूंच्या कॅलिपर होत्या. वजनाला या कॅलिपर तीनतीन किलो, म्हणजे मुलांसाठी जडच. पाय ओढावे लागत होते या मुलांना. डॉक्टर

Jul 28, 2015 मुंबई भारताने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत (इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) अग्नी आणि पृथ्वी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या घेतल्यानंतर तसेच पोखरण येथील दुसऱ्या अणुचाचण्यांनंतर अब्दुल कलाम यांचे नाव भारताचे ‘मिसाइल मॅन’ म्हणून सर्वतोमुखी झाले. देशाने संरक्षणाच्या बाबतीत अद्ययावत तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनावे म्हणून १९८२-८३ सालच्या दरम्यान हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. तत्पूर्वी कलाम भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) एसएलव्ही-३ या उपग्रह प्रक्षेपक कार्यक्रमाचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. क्षेपमास्त्रनिमिíती कार्यक्रम हाती घेतल्यानंतर त्यांना संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे (डीआरडीएल) चे संचालक म्हणून नेमून एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची सूत्रे त्यांच्या हाती देण्यात आली. या कार्यक्रमात संरक्षण दले, इस्रो, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) अशा अनेक संस्थांचा सहभाग होता. त्या अंतर्गत जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे पृथ्वी हे लघु पल्ल्याचे (१५० ते २५० किमी)े, अग्नी हे मध्यम पल्ल्याचे (१५०० ते २५०० किमी) क्षेपणास्त्र, जमिनीवरून हवेत मारा करणारे लघु पल्ल्याचे (९ किमी) त्रिशुळ, जमिनीवरून हवेत मारा करणारे मध्यम पल्ल्याचे (२५ किमी) आकाश आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे रणगाडाभेदी (४ किमी) नाग अशी क्षेपणास्त्रे विकसित करम्याचे उद्दिष्ट होते. प्रथम ती वेगवेगळी विकसित करम्याचा प्रस्ताव होता. मात्र नंतर तत्कालीन संरक्षणमंत्री आर. वेकटरमन यांनी ती एकाच वेळी विकसित करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १९८८ साली पृथ्वी आणि आणि १९८९ साली अग्नीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आणि हे तंत्रज्ञान अवगत असलेल्या हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या देशांच्या पंक्तीत विराजमान झााला. हे संवेदनशील तंत्रज्ञान भारताला मिळू नये म्हणून जगातील बडय़ा महासत्तांनी आणि ‘मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रीजिम’ (एमटीसीआर) या करारातील देशांनी बरेच अडसर निर्माण केले. त्या सर्व अडचणींवर भारताने मात करत स्वत:च्या बळावर भारताने हे तंत्रज्ञान हस्तगत केले. त्यानंतर पोखरण येथे झालेल्या दुसऱ्या अणुचाचण्यांमध्येही कलाम यांचे मोठे योगदान होते. काही किस्से आणि आठवणी.. जगात क्षेपणास्त्रांचा प्रसार होण्याच्या कित्येक वर्षे आधी म्हणजे दुसऱ्या महायुद्धात अॅडॉल्फ हिटलरच्या नाझी जर्मनीत वेर्नर फॉन ब्रॉन आणि वॉल्टर डॉर्नबर्गर या दोन शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली ‘व्ही-१’ आणि ‘व्ही-२’ (व्हेंजन्स वेपन) ही पहिली क्षेपणास्त्र बनवून ती ब्रिटनवर डागलीही होती. महायुद्धाच्या समाप्तीनंतर वेर्नर फॉन ब्रॉन आणि त्यांचे अनेक शास्त्रज्ञ अमेरिकेत गेले आणि नासाच्या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. हेच वेर्नर फॉन ब्रॉन नंतर भारतात येऊन इस्रोला भेट दिली होती. त्यावेळच्या भेटीचा किस्सा कलाम यांनी त्यांच्या अग्निपंख या पुस्तकात सांगितला आहे. ब्रॉन यांनी भारताच्या संशोधकांचे कौतुक करून आपल्या कार्यक्रमात काही सूचना केल्या होत्या. एसएलव्ही-३ चे तळाचा व्यास आणि उंचीचे गुणोत्तर थोडे अधिक असल्याचे ब्रॉन यांनी सांगितले होते. नंतर भारताने त्यानुसार बदल केले होते. Promoted

Say goodbye

Salute. To honour

.. दानाची सर्वसंमत व्याख्या म्हणजे आपलं पोट भरल्यावर उर्वरित संपत्तीतीलछोटा-मोठा भाग समाजासाठी देणं. या संकल्पनेला पूर्णपणे छेद देत आपल्या ३५ वर्षांच्या नोकरीत दरमहा कमावलेली पै न् पै समाजासाठी देणारा एक देवदूत म्हणजे पालम कल्याणसुंदरम. चेन्नईजवळील सैदापेट या भागातल्या या अवलियाने दर महिन्याच्या पगाराबरोबरच निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाचे दहा लाख रुपये आणि त्यावरही कडी म्हणजे पुरस्कारांचे ३० कोटी रुपयेही समाजाच्या विनियोगासाठी दिले आहेत. अभिनेता रजनीकांत यांनी तर त्यांना वडील म्हणून दत्तक घेतलं असून बिल क्लिंटन यांनाही भारतात आल्यावर त्यांची भेट घेण्याचा मोह आवरला नाही. याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या पगारातला सर्व पैसा दानासाठी देणाऱ्या पालम यांनी आपल्या उपजीविकेसाठी म्हणजे दोन वेळचं जेवण आणि इतर अल्प गरजांसाठी आयुष्यभर एका हॉटेलात वेटर म्हणून पार्ट-टाइम काम केलं, इतकंच नव्हे तर आपल्या मिळकतीला अन्य वाटा फुटायला नकोत म्हणून लग्नही केलं नाही. सानेगुरुजींच्या श्यामच्या आईचं मातृत्व आणि कर्णाचं दातृत्व एकवटलेल्या या संताची ही स्फूर्तिदायी कहाणी. तिरुनेलवेल्ली जिल्ह्य़ातील मेलाकारू वेलांगुलम या छोटय़ाशा खेडय़ात त्यांचं बालपण गेलं. हे गाव जेमतेम ३० उंबऱ्यांचं. वीज नाही.. रस्ते नाहीत.. शाळा नाही.. साधं काडेपेटीचंही दुकान नाही. सगळय़ात जवळची शाळाही १० कि.मी. दूर. हे जाऊन-येऊनचं २० कि.मी.चं अंतर रोज एकटय़ाने चालण्याचा त्यांना खूप कंटाळा येई. अशा वेळी एकदा त्यांच्या मनात आलं, ‘गावातील मुलं जर आपल्याबरोबर शाळेत आली तर हा प्रवास हसत खेळत संपेल. बाकीची मुलं शाळेत न जाण्याचं कारण होतं गरिबी. त्या वेळची महिना ५ रुपये फीदेखील कोणाला परवडणारी नव्हती. तेव्हा कल्याणसुंदरम या ९-१० वर्षांच्या मुलाच्या मनात एक वेगळाच विचार आला आणि त्याने आईकडे त्या मुलांच्या फीच्या पैशासाठी हट्ट धरला. कल्याणसुंदरम यांचे वडील ते दहा महिन्यांचे असताना निवर्तले होते. त्यामुळे आईचा आणि आजीचा या बापविना लेकरावर भारी जीव. त्या दोघींनी आपल्या मुलाचा हा जगावेगळा हट्ट तर पुरवलाच, शिवाय त्या मुलांच्या युनिफॉर्मची व वह्य़ा-पुस्तकांची सोय केली. कल्याणसुंदरम यांनी पुढे जो दानाचा इतिहास रचला, त्याचा पाया हा असा रचला गेला असावा. मात्र यावर त्यांचं म्हणणं, ‘माझ्या त्या कृत्याला स्वार्थाचा वास होता. मात्र दुसऱ्यासाठी काही तरी करण्याची खरी जाणीव मला झाली ती पंतप्रधान पंडित नेहरूंनी भारत-चीन युद्धाच्या वेळी राष्ट्राला उद्देशून घातलेली साद ऐकली तेव्हा. कल्याणसुंदरम त्या वेळी कॉलेजात शिकत होते. नेहरूंनी रेडिओवरून संरक्षण निधीसाठी केलेलं आवाहन ऐकल्याबरोबर त्यांनी आपल्या गळय़ातली सोन्याची चेन त्या वेळचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री कामराज यांना नेऊन दिली. एका तरुण मुलाने देशसेवेसाठी उचललेलं हे पाऊल पाहून मुख्यमंत्रीही चकित झाले आणि त्यांनी या देशभक्ताचा खास गौरव केला. बी. ए. नंतर कल्याणसुंदरम यांना तमिळ साहित्यात एम. ए. करण्याची इच्छा होती, परंतु या विषयासाठी दुसरा विद्यार्थी नसल्याने कॉलेज व्यवस्थापनाने त्यांना अन्य विषय घेण्यास सुचवलं. पण त्यांनी तमिळचा आग्रह सोडला नाही. त्यांच्या या मातृभाषेवरील प्रेमाने एम.टी.टी. कॉलेजचे संस्थापकही प्रभावित झाले आणि त्यांनी या एका मुलासाठी ती सोय उपलब्ध करून दिली. एवढंच नव्हे तर त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्चही उचलला. तमिळ साहित्यातील मास्टर्स डिग्रीबरोबर त्यांनी लायब्ररी सायन्समध्ये सुवर्णपदक मिळवले आणि गुरुजनांचा विश्वास सार्थ ठरवला. शिक्षण पूर्ण झाल्यावर कल्याणसुंदरम यांनी कुमारकारुपा आर्ट्स कॉलेजमध्ये सलग ३५ वर्षे ग्रंथपाल अर्थात लायब्ररियन म्हणून नोकरी केली आणि पहिल्या पगारापासून शेवटच्या पगारापर्यंतचा एकूण एक पैसा समाजाच्या सेवेसाठी अर्पण केला. वयाबरोबर त्यांची देण्याची मनोकामना अधिकच तीव्र होत गेली. वडिलोपार्जित घर विकून आलेले पैसे असोत की पगारवाढीमुळे मिळणारी थकबाकी असो किंवा फंडाची एकहाती मिळालेली दहा लाख रुपयांची रक्कम असो, सगळा ओघ गोरगरिबांच्या, अनाथांच्या उद्धाराच्या दिशेने जात राहिला. गरिबांचा त्यांना एवढा कळवळा की त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी ते रेल्वे फ्लॅटफॉर्मवर आणि दुकानांच्या पायऱ्यांवरही झोपलेले आहेत. कल्याणसुंदरम यांच्या परोपकारी विचारसरणीचा उगम त्यांच्या आईच्या संस्कारात आहे. सुखी होण्यासाठी आईने सांगितलेले तीन नियम त्यांनी हृदयावर कोरून ठेवलेत. पहिली गोष्ट म्हणजे कशाचाही लोभ धरू नकोस. दुसरं म्हणजे जे काही तुझ्या हातात आहे त्याचे दहा समान भाग कर आणि त्यातील एक भाग सत्कार्यासाठी दे आणि आईचं तिसरं सांगणं म्हणजे किमान एका जिवाला आनंद दिल्याशिवाय रात्री झोपू नको. त्यांची आई म्हणायची एवढय़ा तीन गोष्टी जरी तू आचरणात आणल्यास तरी कोणत्याही परिस्थितीत सुखी राहशील आणि खरंच आज जगात कल्याणसुंदरम यांच्याइतका सुखी व समाधानी माणूस दुसरा कोणी नसेल! एवढं उदात्त ध्येय नजरेसमोर ठेवून मार्गक्रमण करताना त्यांच्या वाटय़ाला दु:ख आलंच नाही, असं मात्र नाही. आपल्या किनऱ्या, चिरक्या आवाजाच्या न्यूनगंडाने त्यांना एके काळी एवढं पछाडलं होतं की आत्महत्या करण्याचा विचारही त्यांच्या मनात घोळत होता. परंतु व्यक्तिमत्त्व विकासावर पुस्तकं लिहिणारे थामिझवानम त्यांना भेटले आणि त्या लेखकाने कानमंत्र दिला, ‘आपल्या बोलण्याची चिंता करण्यात तू वेळ दवडू नकोस. त्यापेक्षा लोकांनी तुझ्याबद्दल चांगलं बोलावं यासाठी प्रयत्नांची शर्थ कर.’ त्यानंतर मात्र तो न्यूनगंड त्यांनी मनाआड करून टाकला. मानवतेच्या या सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने देशातील सर्वोत्तम ग्रंथपाल म्हणून त्यांना गौरवलं. ‘युनो’ने २०व्या शतकातील एक असामान्य व्यक्ती या शब्दात त्यांचा सन्मान केला. इंटरनॅशनल बायोग्राफिक सेंटर, केंब्रिजतर्फे त्यांना जगातील सर्वात दयाळू व्यक्ती म्हणून घोषित केलं. एका अमेरिकन संस्थेने तर त्यांना ‘मॅन ऑफ मिलेनियम’ ही पदवी बहाल केली तर रोटरी इंटरनॅशनलने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. ‘मॅन ऑफ मिलेनियम’ या पुरस्कारांपोटी मिळालेली ३० कोटी रुपयांची गंगाजळी समाजार्पण झालीच. आणखी एक विशेष सन्मानाची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे त्या वेळचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी दोन भारतीयांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातील एक म्हणजे डॉ. अब्दुल कलाम आणि दुसरे पालम कल्याणसुंदरम. क्लिंटन यानी भारत सरकारला लिहिलेल्या पत्रातील शब्द असे होते.. ‘एक मध्यमवर्गीय माणूस ज्याने संपूर्ण हयातीत कधीही एक कोटी रुपये बघितलेले नाहीत, त्याने मिळवलेले ३० कोटी रुपये सहज दान केले, अशा त्या व्यक्तीला मला भेटायचंय.’ ही भेट कल्याणसुंदरम यांच्या मनात चांदणं बनून राहिलीय. त्यांचा दानाचा केंद्रबिंदू गरीब व अनाथ मुलांचं शिक्षण हा होता. आहे. त्यासाठी त्यांनी निवृत्तीनंतर (१९९८) ‘पालम’ या संस्थेची स्थापना केली. ही संस्था दाते व गरजवंत यांच्यातल्या दुव्याचं काम करते. (पालम या शब्दाचा अर्थच पूल अथवा दुवा) इथे फक्त पैशांची मदत मिळते असं नाही तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, गरजूंना वैद्यकीय सल्ला दिला जातो. रक्तदान शिबिरं भरवण्यात येतात. वृद्ध, आजारी, बेरोजगार व अपंग व्यक्तीचं पुनर्वसन केलं जातं. चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पालमचा मदतीचा हात नेहमी पुढे असतो. निराधार गरीब मुलांच्या मदतीसाठी त्यांनी ‘अ‍ॅन्ड्रय़ू पालम’ नावाचं मासिक सुरू केलंय. ज्यात सामान्यातील असामान्यांच्या कथा/बातम्या दिल्या जातात. ७३ वर्षांचे कल्याणसुंदरम आजही चेन्नईतील अडयार येथील आपल्या कार्यालयात रोज येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. आपल्या कार्यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेणं हे पालम यांचं ध्येय आहे. म्हणूनच या संस्थेची महिना सभासद वर्गणी आहे रुपये १ ते १०. (ज्याला जशी परवडेल तशी) आणि आजीव सभासत्वाची फी शंभर रुपये. ‘पालम’ने सर्वसामान्यांनाही प्रेरित केलंय याचं एक उदाहरण म्हणजे अरुप्पु कोत्ताई या गावातील एका अशिक्षित, रोजंदारीवर काम करणाऱ्या तमिळ मणी नावाच्या माणसाने ‘पालम’साठी गेल्या १५ वर्षांत २० लाख रुपये जमा केले. विशेष म्हणजे हा माणूस त्या छोटय़ा गावाच्या बाहेरही जाऊ शकत नव्हता आणि त्या गावातील कोणाचीही दहा रुपयांच्या वर देण्याची ऐपत नव्हती तरीही. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत तर कल्याणसुंदरम यांच्या निरपेक्ष सेवेने एवढे भरावले की या अभिनेत्याने त्यांना वडील म्हणून दत्तक घेतलं. पण त्यांच्या आलिशान बंगल्यात, तिथल्या उच्च जीवनशैलीत ते रमू शकले नाहीत. त्यामुळे दोनच महिन्यात ते पुन्हा आपल्या आठ-बाय-आठच्या खोलीत राहायला आले. मात्र या दोघांमध्ये एक जिव्हाळय़ाचा बंध निर्माण झालाय एवढं खरं! ३० कोटी रुपयांचं दान केल्याच्या बातमीने कल्याणसुंदरम एकदम प्रकाशझोतात आले. ३०० मासिकांतून आणि १५ दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या. पण त्यांचे पाय मात्र कायम जमिनीवरच राहिले. जाताना माणूस काहीच बरोबर घेऊन जात नाही, हे माहीत असलं तरी मिळवलेल्या सर्वस्वाचं दान करणारे पालम कल्याणसुंदरम यांच्यासारखा एकमेवच. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष असं म्हटलं जातं. यानुसार इहलोकातच मोक्ष मिळवणाऱ्या या तपस्व्याकडे पाहताना कुसुमाग्रजांचे शब्द आठवतात.. किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी.

.. दानाची सर्वसंमत व्याख्या म्हणजे आपलं पोट भरल्यावर उर्वरित संपत्तीतीलछोटा-मोठा भाग समाजासाठी देणं. या संकल्पनेला पूर्णपणे छेद देत आपल्या ३५ वर्षांच्या नोकरीत दरमहा कमावलेली पै न् पै समाजासाठी देणारा एक देवदूत म्हणजे पालम कल्याणसुंदरम. चेन्नईजवळील सैदापेट या भागातल्या या अवलियाने दर महिन्याच्या पगाराबरोबरच निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाचे दहा लाख रुपये आणि त्यावरही कडी म्हणजे पुरस्कारांचे ३० कोटी रुपयेही समाजाच्या विनियोगासाठी दिले आहेत. अभिनेता रजनीकांत यांनी तर त्यांना वडील म्हणून दत्तक घेतलं असून बिल क्लिंटन यांनाही भारतात आल्यावर त्यांची भेट घेण्याचा मोह आवरला नाही. याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या पगारातला सर्व पैसा दानासाठी देणाऱ्या पालम यांनी आपल्या उपजीविकेसाठी म्हणजे दोन वेळचं जेवण आणि इतर अल्प गरजांसाठी आयुष्यभर एका हॉटेलात वेटर म्हणून पार्ट-टाइम काम केलं, इतकंच नव्हे तर आपल्या मिळकतीला अन्य वाटा फुटायला नकोत म्हणून लग्नही केलं नाही. सानेगुरुजींच्या श्यामच्या आईचं मातृत्व आणि कर्णाचं दातृत्व एकवटलेल्या या संताची ही स्फूर्तिदायी कहाणी. तिरुनेलवेल्ली जिल्ह्य़ातील मेलाकारू वेलांगुलम या छोटय़ाशा खेडय़ात त्यांचं बालपण गेलं. हे गाव जेमतेम ३० उंबऱ्यांचं. वीज नाही.. रस्ते नाहीत.. शाळा नाही.. साधं काडेपेटीचंही दुकान नाही. सगळय़ात जवळची शाळाही १० कि.मी. दूर. हे जाऊन-येऊनचं २० कि.मी.चं अंतर रोज एकटय़ाने चालण्याचा त्यांना खूप कंटाळा येई. अशा वेळी एकदा त्यांच्या मनात आलं, ‘गावातील मुलं जर आपल्याबरोबर शाळेत आली तर हा प्रवास हसत खेळत संपेल. बाकीची मुलं शाळेत न जाण्याचं कारण होतं गरिबी. त्या वेळची महिना ५ रुपये फीदेखील कोणाला परवडणारी नव्हती. तेव्हा कल्याणसुंदरम या ९-१० वर्षांच्या मुलाच्या मनात एक वेगळाच विचार आला आणि त्याने आईकडे त्या मुलांच्या फीच्या पैशासाठी हट्ट धरला. कल्याणसुंदरम यांचे वडील ते दहा महिन्यांचे असताना निवर्तले होते. त्यामुळे आईचा आणि आजीचा या बापविना लेकरावर भारी जीव. त्या दोघींनी आपल्या मुलाचा हा जगावेगळा हट्ट तर पुरवलाच, शिवाय त्या मुलांच्या युनिफॉर्मची व वह्य़ा-पुस्तकांची सोय केली. कल्याणसुंदरम यांनी पुढे जो दानाचा इतिहास रचला, त्याचा पाया हा असा रचला गेला असावा. मात्र यावर त्यांचं म्हणणं, ‘माझ्या त्या कृत्याला स्वार्थाचा वास होता. मात्र दुसऱ्यासाठी काही तरी करण्याची खरी जाणीव मला झाली ती पंतप्रधान पंडित नेहरूंनी भारत-चीन युद्धाच्या वेळी राष्ट्राला उद्देशून घातलेली साद ऐकली तेव्हा. कल्याणसुंदरम त्या वेळी कॉलेजात शिकत होते. नेहरूंनी रेडिओवरून संरक्षण निधीसाठी केलेलं आवाहन ऐकल्याबरोबर त्यांनी आपल्या गळय़ातली सोन्याची चेन त्या वेळचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री कामराज यांना नेऊन दिली. एका तरुण मुलाने देशसेवेसाठी उचललेलं हे पाऊल पाहून मुख्यमंत्रीही चकित झाले आणि त्यांनी या देशभक्ताचा खास गौरव केला. बी. ए. नंतर कल्याणसुंदरम यांना तमिळ साहित्यात एम. ए. करण्याची इच्छा होती, परंतु या विषयासाठी दुसरा विद्यार्थी नसल्याने कॉलेज व्यवस्थापनाने त्यांना अन्य विषय घेण्यास सुचवलं. पण त्यांनी तमिळचा आग्रह सोडला नाही. त्यांच्या या मातृभाषेवरील प्रेमाने एम.टी.टी. कॉलेजचे संस्थापकही प्रभावित झाले आणि त्यांनी या एका मुलासाठी ती सोय उपलब्ध करून दिली. एवढंच नव्हे तर त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्चही उचलला. तमिळ साहित्यातील मास्टर्स डिग्रीबरोबर त्यांनी लायब्ररी सायन्समध्ये सुवर्णपदक मिळवले आणि गुरुजनांचा विश्वास सार्थ ठरवला. शिक्षण पूर्ण झाल्यावर कल्याणसुंदरम यांनी कुमारकारुपा आर्ट्स कॉलेजमध्ये सलग ३५ वर्षे ग्रंथपाल अर्थात लायब्ररियन म्हणून नोकरी केली आणि पहिल्या पगारापासून शेवटच्या पगारापर्यंतचा एकूण एक पैसा समाजाच्या सेवेसाठी अर्पण केला. वयाबरोबर त्यांची देण्याची मनोकामना अधिकच तीव्र होत गेली. वडिलोपार्जित घर विकून आलेले पैसे असोत की पगारवाढीमुळे मिळणारी थकबाकी असो किंवा फंडाची एकहाती मिळालेली दहा लाख रुपयांची रक्कम असो, सगळा ओघ गोरगरिबांच्या, अनाथांच्या उद्धाराच्या दिशेने जात राहिला. गरिबांचा त्यांना एवढा कळवळा की त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी ते रेल्वे फ्लॅटफॉर्मवर आणि दुकानांच्या पायऱ्यांवरही झोपलेले आहेत. कल्याणसुंदरम यांच्या परोपकारी विचारसरणीचा उगम त्यांच्या आईच्या संस्कारात आहे. सुखी होण्यासाठी आईने सांगितलेले तीन नियम त्यांनी हृदयावर कोरून ठेवलेत. पहिली गोष्ट म्हणजे कशाचाही लोभ धरू नकोस. दुसरं म्हणजे जे काही तुझ्या हातात आहे त्याचे दहा समान भाग कर आणि त्यातील एक भाग सत्कार्यासाठी दे आणि आईचं तिसरं सांगणं म्हणजे किमान एका जिवाला आनंद दिल्याशिवाय रात्री झोपू नको. त्यांची आई म्हणायची एवढय़ा तीन गोष्टी जरी तू आचरणात आणल्यास तरी कोणत्याही परिस्थितीत सुखी राहशील आणि खरंच आज जगात कल्याणसुंदरम यांच्याइतका सुखी व समाधानी माणूस दुसरा कोणी नसेल! एवढं उदात्त ध्येय नजरेसमोर ठेवून मार्गक्रमण करताना त्यांच्या वाटय़ाला दु:ख आलंच नाही, असं मात्र नाही. आपल्या किनऱ्या, चिरक्या आवाजाच्या न्यूनगंडाने त्यांना एके काळी एवढं पछाडलं होतं की आत्महत्या करण्याचा विचारही त्यांच्या मनात घोळत होता. परंतु व्यक्तिमत्त्व विकासावर पुस्तकं लिहिणारे थामिझवानम त्यांना भेटले आणि त्या लेखकाने कानमंत्र दिला, ‘आपल्या बोलण्याची चिंता करण्यात तू वेळ दवडू नकोस. त्यापेक्षा लोकांनी तुझ्याबद्दल चांगलं बोलावं यासाठी प्रयत्नांची शर्थ कर.’ त्यानंतर मात्र तो न्यूनगंड त्यांनी मनाआड करून टाकला. मानवतेच्या या सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने देशातील सर्वोत्तम ग्रंथपाल म्हणून त्यांना गौरवलं. ‘युनो’ने २०व्या शतकातील एक असामान्य व्यक्ती या शब्दात त्यांचा सन्मान केला. इंटरनॅशनल बायोग्राफिक सेंटर, केंब्रिजतर्फे त्यांना जगातील सर्वात दयाळू व्यक्ती म्हणून घोषित केलं. एका अमेरिकन संस्थेने तर त्यांना ‘मॅन ऑफ मिलेनियम’ ही पदवी बहाल केली तर रोटरी इंटरनॅशनलने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. ‘मॅन ऑफ मिलेनियम’ या पुरस्कारांपोटी मिळालेली ३० कोटी रुपयांची गंगाजळी समाजार्पण झालीच. आणखी एक विशेष सन्मानाची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे त्या वेळचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी दोन भारतीयांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातील एक म्हणजे डॉ. अब्दुल कलाम आणि दुसरे पालम कल्याणसुंदरम. क्लिंटन यानी भारत सरकारला लिहिलेल्या पत्रातील शब्द असे होते.. ‘एक मध्यमवर्गीय माणूस ज्याने संपूर्ण हयातीत कधीही एक कोटी रुपये बघितलेले नाहीत, त्याने मिळवलेले ३० कोटी रुपये सहज दान केले, अशा त्या व्यक्तीला मला भेटायचंय.’ ही भेट कल्याणसुंदरम यांच्या मनात चांदणं बनून राहिलीय. त्यांचा दानाचा केंद्रबिंदू गरीब व अनाथ मुलांचं शिक्षण हा होता. आहे. त्यासाठी त्यांनी निवृत्तीनंतर (१९९८) ‘पालम’ या संस्थेची स्थापना केली. ही संस्था दाते व गरजवंत यांच्यातल्या दुव्याचं काम करते. (पालम या शब्दाचा अर्थच पूल अथवा दुवा) इथे फक्त पैशांची मदत मिळते असं नाही तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, गरजूंना वैद्यकीय सल्ला दिला जातो. रक्तदान शिबिरं भरवण्यात येतात. वृद्ध, आजारी, बेरोजगार व अपंग व्यक्तीचं पुनर्वसन केलं जातं. चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पालमचा मदतीचा हात नेहमी पुढे असतो. निराधार गरीब मुलांच्या मदतीसाठी त्यांनी ‘अ‍ॅन्ड्रय़ू पालम’ नावाचं मासिक सुरू केलंय. ज्यात सामान्यातील असामान्यांच्या कथा/बातम्या दिल्या जातात. ७३ वर्षांचे कल्याणसुंदरम आजही चेन्नईतील अडयार येथील आपल्या कार्यालयात रोज येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. आपल्या कार्यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेणं हे पालम यांचं ध्येय आहे. म्हणूनच या संस्थेची महिना सभासद वर्गणी आहे रुपये १ ते १०. (ज्याला जशी परवडेल तशी) आणि आजीव सभासत्वाची फी शंभर रुपये. ‘पालम’ने सर्वसामान्यांनाही प्रेरित केलंय याचं एक उदाहरण म्हणजे अरुप्पु कोत्ताई या गावातील एका अशिक्षित, रोजंदारीवर काम करणाऱ्या तमिळ मणी नावाच्या माणसाने ‘पालम’साठी गेल्या १५ वर्षांत २० लाख रुपये जमा केले. विशेष म्हणजे हा माणूस त्या छोटय़ा गावाच्या बाहेरही जाऊ शकत नव्हता आणि त्या गावातील कोणाचीही दहा रुपयांच्या वर देण्याची ऐपत नव्हती तरीही. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत तर कल्याणसुंदरम यांच्या निरपेक्ष सेवेने एवढे भरावले की या अभिनेत्याने त्यांना वडील म्हणून दत्तक घेतलं. पण त्यांच्या आलिशान बंगल्यात, तिथल्या उच्च जीवनशैलीत ते रमू शकले नाहीत. त्यामुळे दोनच महिन्यात ते पुन्हा आपल्या आठ-बाय-आठच्या खोलीत राहायला आले. मात्र या दोघांमध्ये एक जिव्हाळय़ाचा बंध निर्माण झालाय एवढं खरं! ३० कोटी रुपयांचं दान केल्याच्या बातमीने कल्याणसुंदरम एकदम प्रकाशझोतात आले. ३०० मासिकांतून आणि १५ दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या. पण त्यांचे पाय मात्र कायम जमिनीवरच राहिले. जाताना माणूस काहीच बरोबर घेऊन जात नाही, हे माहीत असलं तरी मिळवलेल्या सर्वस्वाचं दान करणारे पालम कल्याणसुंदरम यांच्यासारखा एकमेवच. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष असं म्हटलं जातं. यानुसार इहलोकातच मोक्ष मिळवणाऱ्या या तपस्व्याकडे पाहताना कुसुमाग्रजांचे शब्द आठवतात.. किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी.

साबुदाणा – समज आणि गैरसमज !! | Articles

साबुदाणा – समज आणि गैरसमज !! | Articles

Sunday, July 26, 2015

शिस्तीचे धडे First Published :27-July-2015 : 00:34:35 Last Updated at: 27-July-2015 : 00:18:59 औंध : खटाव तालुक्यातील औंध हे विद्येचे माहेरघर आहे. शिवाय पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे दररोज पर्यटक व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. मात्र काही सडकसख्याहरींकडून कॉलेज सुटल्यानंतर बसस्थानक परिसर, कॉलेज आवारात स्टंटबाजी केली जात होती, त्यामुळे विद्यार्थिनींना असुरक्षित वाटत होते. याबाबत औंध पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बसस्थानकात थांबून चांगलेच शिस्तीचे धडे दिले.कॉलेज सुटल्यानंतर औंध बसस्थानक परिसरात रोडरोमिओ, मोटारसायकल रायडर्स स्टंटबाजी करत असल्याचे प्रकार सुरू होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक्ष उदय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांनी कॉलेज परिसर, बसस्थानक परिसरावर लक्ष ठेवून रोडरोमिओ, रायडर्सवर चांगलाच वचक निर्माण केला आहे. भयमुक्त वातावरण निर्माण केल्यामुळे औंधसह शेजारी खेड्यापाड्यातील पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, एसटी बसमध्ये चढताना ढकलाढकलीचे प्रकार होत असतात. यातून वादावादी होऊन त्याचे पर्यवसान भांडणात होते. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, यासाठी हवालदार प्रशांत पाटील यांनी बसस्थानकात थांबून बसमध्ये चढताना प्रथम विद्यार्थिनी व नंतर विद्यार्थी अशी शिस्त लावली आहे. यामुळे विद्यार्थिनींनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत. (वार्ताहर) वाहतूक पोलीस प्रशांत पाटील यांनी सडकसख्याहरींवर चांगलाच वचक निर्माण केल्यामुळे चांगली शिस्त लागली आहे. हा उपक्रम असाच चालू राहावा. - मुराद मुलाणी, हॉटेल व्यावसायिक

Preparing for a job interview can make the difference between success and failure. The 100 common job interview questions below will help you market yourself more effectively and feel more confident on that important day. The questions have been organized by topic. Review the questions carefully and take time to create the best answers for you. You may even wish to write out your answers so you can refer to them in the future. Good luck! Personal Tell me about yourself. What are your strengths? The word strength refers to what you do well, your positive qualities or effective skills. What are your weaknesses? The word weakness refers to what you don’t do well, your negative qualities or skills. What do you see as a major success in your life? Major means important or big. Describe a major disappointment in your life. A disappointment is something you were looking forward to and didn’t happen. What motivates you? The word motivate means to give you the reason to do something, to inspire you, to encourage you. What does success mean to you? What are three of your greatest accomplishments? The word accomplishment means an achievement, something you did well. What are your plans for the future? Have you done any volunteer work? What are your hobbies? What do you like to do in your spare time / free time? Spare time means when you’re free, when you’re not working. Where do you see yourself five years from now? Ten years from now? Describe a time when you failed. What is your favourite book / movie? What do you do for fun? What would you do if you won the lottery? Educational Tell me about your educational background. What academic courses did you like the most / the least? Which academic course did you find most difficult? Do you have plans for further education? Why did you choose your major? Your major is your main area of specialization in university. Professional Why do you want this job? Why should we hire you? To hire means to recruit, or give someone a job. Why are you the best person for the job? Explain how you would be an asset to this company. An asset is something valuable. Why do you think you will be successful in this job? What are your qualifications for this position? Qualification means the educational and professional background or experience needed in a job. What can you offer our company? What do you know about this industry? What is your personal mission statement? Why do you think you’re suited for this position? Suited means appropriate, a good match. Describe your work ethic. Your work ethic is your attitude towards work and behavior at work. Describe your management style. What are your short-term goals? Short-term means in the near future. What are your long-term goals? Long-term means in the distant or far future. Why did you choose this field? Field means an area of work, such as computers, engineering or medicine. Please describe your work experience. Why do you want to work for our company? What do you know about our company? What is most important to you in a job? Describe your previous jobs. The word previous means what came or happened before. Why did you leave your previous job? What were your responsibilities in your previous position? The word responsibility refers to what you are supposed to do, what you are in charge of. What did you like the most about your last job? What did you like the least about your last job? What did you learn in your previous job? Do you work well under pressure? The word pressure means stress. Are you punctual? To be punctual means that to arrive on time, to not be late. How long do you plan to stay in this job? Can you multi-task? To multi-task means to do many things at one time. Describe your ideal job. Ideal basically means perfect here. How would your co-workers describe you? How do you feel about learning new things? Have you ever had trouble with a boss? How did you handle it? What major problems or challenges have you faced? Why did you resign? Why we

Sentences 1. Wrong I have visited Niagara Falls last weekend. Right I visited Niagara Falls last weekend. 2. Wrong The woman which works here is from Japan. Right The woman who works here is from Japan. 3. Wrong She’s married with a dentist. Right She’s married to a dentist. 4. Wrong She was boring in the class. Right She was bored in the class. 5. Wrong I must to call him immediately. Right I must call him immediately. 6. Wrong Every students like the teacher. Right Every student likes the teacher. 7. Wrong Although it was raining, but we had the picnic. Right Although it was raining, we had the picnic. 8. Wrong I enjoyed from the movie. Right I enjoyed the movie. 9. Wrong I look forward to meet you. Right I look forward to meeting you. 10. Wrong I like very much ice cream. Right I like ice cream very much. 11. Wrong She can to drive. Right She can drive. 12. Wrong Where I can find a bank? Right Where can I find a bank? 13. Wrong I live in United States. Right I live in the United States. 14. Wrong When I will arrive, I will call you. Right When I arrive, I will call you. 15. Wrong I’ve been here since three months. Right I’ve been here for three months. 16. Wrong My boyfriend has got a new work. Right My boyfriend has got a new job. (or just “has a new job”) 17. Wrong She doesn’t listen me. Right She doesn’t listen to me. 18. Wrong You speak English good. Right You speak English well. 19. Wrong The police is coming. Right The police are coming. 20. Wrong The house isn’t enough big. Right The house isn’t big enough. 21. Wrong You should not to smoke. Right You should not smoke. 22. Wrong Do you like a glass of wine? Right Would you like a glass of wine? 23. Wrong There is seven girls in the class. Right There are seven girls in the class. 24. Wrong I didn’t meet nobody. Right I didn’t meet anybody. 25. Wrong My flight departs in 5:00 am. Right My flight departs at 5:00 am. 26. Wrong I promise I call you next week. Right I promise I’ll call you next week. 27. Wrong Where is post office? Right Where is the post office? 28. Wrong Please explain me how improve my English. Right Please explain to me how to improve my English. 29. Wrong We studied during four hours. Right We studied for four hours. 30. Wrong Is ready my passport? Right Is my passport ready? 31. Wrong You cannot buy all what you like! Right You cannot buy all that you like! 32. Wrong She is success. Right She is successful. 33. Wrong My mother wanted that I be doctor. Right My mother wanted me to be a doctor. 34. Wrong The life is hard! Right Life is hard. 35. Wrong How many childrens you have? Right How many children do you have? 36. Wrong My brother has 10 years. Right My brother is 10 (years old). 37. Wrong I want eat now. Right I want to eat now. 38. Wrong You are very nice, as your mother. Right You are very nice, like your mother. 39. Wrong She said me that she liked you. Right She told me that she liked you. 40. Wrong My husband engineer. Right My husband is an engineer. 41. Wrong I came Australia to study English. Right I came to Australia to study English. 42. Wrong It is more hot now. Right It’s hotter now. 43. Wrong You can give me an information? Right Can you give me some information? 44. Wrong They cooked the dinner themself. Right They cooked the dinner themselves. 45. Wrong Me and Johnny live here. Right Johnny and I live here. 46. Wrong I closed very quietly the door. Right I closed the door very quietly. 47. Wrong You like dance with me? Right Would you like to dance with me? 48. Wrong I go always to school by subway. Right I always go to school by subway. 49. Wrong If I will be in London, I will contact to you. Right If I am in London, I will contact you. 50. Wrong We drive usually to home. Right We usually drive home.

I AM THE WITNESS ! I am not this body. I am not the planet earth. I am not the solar system. I am not the galaxy "Milky Way." I am not the universe. It was i who created this universe. It was i who created these galaxies. It was i who created this solar system. It was i who created the planet earth. It was i who created my body. I am the observer of all these. I created all these "just for fun." Somehow I forget about myself, and became one with my creations. It was a matter of remembrance. It was a short trip to the world which i created. I will return,i will return,i will return to myself. Until then,i want to play,i want to love, i want to fight,i want to work, i want to do all sort of things. But i am the witness,i am the witness,i am the witness. By Sankar Gopalakrishnan Nair

women is water man is soil she is pure he is hard she rains he feeds she smiles better even she cries better he acts better and he fails better both together have harmony of extreme beauty in everything but he is different in forms but she is always pure let it be make them free in nature without pollution

Success is counted sweetest By those who ne'er succeed. To comprehend a nectar Requires sorest need. Not one of all the purple Host Who took the Flag today Can tell the definition So clear of Victory As he defeated-dying On whose forbidden ear The distant strains of triumph Burst agonized and clear!

बारावी निकालाच्या फुग्याला टाचणी! 25 जुलै 2015 - 06:45 AM IST पर्यावरण विषयाचे मूल्यांकन आता बाह्य परीक्षकांद्वारे मुंबई - बारावीच्या दोन वर्षे फुगलेल्या निकालाला थोडीशी टाचणी लावण्याचा निर्णय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. अकरावी आणि बारावीसाठी पर्यावरण या विषयाच्या मूल्यमापनात यंदापासून बदल करण्यात आला आहे. कनिष्ठ महाविद्यालयांत पर्यावरण विषयात सढळ हस्ते केल्या जाणाऱ्या गुणदानावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदापासून 50 पैकी 20 गुणांचे मूल्यमापन बाहेरचे परीक्षक करणार आहेत. बोर्डाने हे परिपत्रक जारी केले आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार 2013-14 पासून बारावीसाठी हा विषय अनिवार्य करण्यात आला. 100 पैकी मिळणारे गुण पूर्वी श्रेणी स्वरूपात दिले जात; मात्र दोन वर्षांपासून त्यांचे रूपांतर गुणांमध्ये झाले. कनिष्ठ महाविद्यालये या विषयात सरासरी 40-45 गुण देऊ लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेकदा प्रकल्पासाठी विनासायास चांगले गुण मिळू लागले. या प्रकारांना आता आळा बसणार आहे. पर्यावरण विषय सर्व शाखांसाठी अनिवार्य आहे. आतापर्यंत या विषयासाठी प्रत्येक सत्रात प्रकल्पासाठी 30 गुण आणि सेमिनार किंवा जर्नल अर्थात प्रयोगवहीसाठी 20 गुण अशी विभागणी होती. दोन्ही सत्रांतील एकूण 100 पैकी जे गुण विद्यार्थ्याला मिळतील त्या गुणांचे 50 पैकी गुणांमध्ये रूपांतर केले जात होते. यंदापासून हा विषय प्रथम व द्वितीय सत्रात न विभागता मूल्यमापन वार्षिक पद्धतीने होईल. म्हणजेच केवळ 50 पैकी गुण असतील. या विषयाची लेखी परीक्षा होत नाही. 50 पैकी 30 गुण प्रकल्पासाठी, तर 20 गुण सेमिनार किंवा जर्नलसाठी पूर्वीप्रमाणेच असतील; पण प्रकल्पाच्या 30 पैकी 20 पैकी गुण अंतर्गत परीक्षक, तर 10 पैकी गुण बाह्यपरीक्षक देतील. सेमिनार किंवा जर्नलच्या 20 पैकी 10 गुणांचे मूल्यांकनही बाह्य परीक्षकांमार्फत होईल. म्हणजेच 50 पैकी 20 गुणांचे मूल्यांकन बोर्डनियुक्त बाह्य परीक्षक करतील. अकरावीसाठीही हीच पद्धत लागू होणार आहे; मात्र अकरावीसाठी बाह्य परीक्षकांचे काम त्याच कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक करतील. पर्यावरण या विषयाचे मूल्यांकन योग्य पद्धतीने व्हायला हवे. विद्यार्थ्यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा. त्यांनी सादर केलेला प्रकल्प पारखून त्यानुसारच गुण देण्यासाठी बाह्य परीक्षक नेमण्यात येणार आहेत. - गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

जन्म स्थळ नोंदी बाबत

कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेबाबत

सातारा जिल्ह्यातील सन २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता ११ वी प्रवेशाची माहिती

ऑनलाईन संच मान्यता सन २०१४-२०१५ शिबिराचे आयोजनाबाबत

अभ्यास करण्याचे काही नियम: • स्वतःवर विश्वास ठेवा आणि ध्येय ठरवा. • वेळापत्रक बनवा व त्याप्रमाणे वागा. • जे महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी वेळ खर्च करा. • चुकांना घाबरू नका. त्यातून बरेच काही शिकता येते. • आपली जास्तीत जास्त बुद्धीमत्ता शैक्षणिक साधने बनविण्यासाठी वापरा. • कमीत कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त काम कसे करता येईल याचे व्यवस्थापन करायला शिका. • वर्षभरातले रोजचे अभ्यासाचे वेळापत्रक बनवून त्याचे कटाक्षाने पालन करावे. • २४ तासांपैकी ८ तास झोप + ६ तास शाळा + १ तास जेवण + १ तास इतर + २ तास खेळणे असं एकूण वेळापत्रक असलं तरी ५-६ तास उरतातच. हा वेळ पूर्णपणे मन लावून अभ्यासाला दिला तर वर्षभर अभ्यासाची छान तयारी होते. • दिवसाचा सगळा वेळ नीट वापरला तर रात्री जागरण करून अभ्यास करण्याची वेळ येतच नाही. • वेळापत्रकात प्रत्येक विषयाला वेळ दिलं गेला पाहिजे. अवघड वाटणाऱ्या विषयांना जास्त वेळ द्यावा. • पाढे, सूत्रे, व आकृत्या यांना वेगळा वेळ देऊन विशेष तयारी करावी. • उत्तरे पाठ करू नयेत. आपल्या भाषेत मुद्द्यांमध्ये प्रश्नांची उत्तरे लिहून काढावीत. इंग्रजीचे स्पेलिंग, अर्थ पाठ करावेत. विज्ञानाच्या व्याख्या पाठ कराव्यात. गणिते सोडवावीत. सखोलपणे तो धडा अभ्यासावा. • आळस, अस्थिरता, तुलना व न्यूनगंड टाळा आणि ‘मला येतच नाही,’ असे न समजता ‘प्रयत्न केले तर मला नक्कीच येईल,’ ही पक्की भूमिका मनात बाळगा. • टी.व्ही. मोबाईल, ऑडिओ, सी.डी. या गोष्टी पूर्णतः बंद असाव्यात. • एकदा अभ्यासासाठी ठरवलेली वेळ दुसऱ्या कोणत्याही आणि कितीही महत्त्वाच्या कामाला देता कामा नये. • अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यासच करावा. जेवण किंवा टी.व्ही. पाहणे असे दुसरे कोणतेही काम करू नये. • आपल्याला अभ्यासासाठी असलेले एकूण विषय आणि अभ्यास करण्यासाठी लागणारा वेळ याचा मेल घालण्यासाठी वेळापत्रक तयार करणे आवश्यक असते. अभ्यास करताना या गोष्टी टाळा: • रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे. • अभ्यास करीत असताना काही खाण्याची किंवा चघळण्याची सवय असणे. • अभ्यास करीत असताना संगीत ऐकणे. • झोपून किंवा चालत-फिरत पडून अभ्यास करणे. मुलांच्या अभ्यासात पालकांची भूमिका: मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी पालकांना बरेच परिश्रम घ्यावे लागतात. धाक दाखवून, चोप देऊन मुलांना अभ्यासाला बसविणाऱ्या पालकांनी सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे कि, मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे उद्दिष्ट त्या मार्गाने कधीही साध्य करता येत नाही. त्यासाठी मुलांच्या अगदी बालपणापासूनच आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. • भूगोल, इतिहास, विज्ञान यांसारख्या विषयांत नकाशे, आकृत्या, फोटोग्राफ्स, कॅसेट्स, व्हिसीडीज आणि सिडीजच्या साहाय्याने आपण त्यांच्या मनात अभ्यासाची गोडी निर्माण करू शकता. • मुलांना अभ्यासाचे दडपण वाटेल असे पालकांनी वागू नये. • वारंवार परीक्षेचे स्मरण करून देऊन मुलांमध्ये दहशत निर्माण होईल असे वागू नये. त्यांना सतत दिलासा देत राहावे. • पाल्य समोर दिसताच त्यांना फक्त अभ्यासाविषयी विचारणे, त्यांच्या मनावर अभ्यासाचे दडपण निर्माण करणे, शिक्षेची दहशत निर्माण करणे, नकारार्थी आणि निराशावादी बोलणे, पदोपदी अपमानित करणे या गोष्टी पालकांनी आवर्जून टाळाव्यात. • पालकांनी मुलांच्या बाबतींत, त्यांच्या कुवतीप्रमाणे रास्त अपेक्षा बाळगण्यात आणि त्या पूर्ण होतील यासाठी अधिकात अधिक सोयी सुविधा त्यांना पुरवाव्यात, त्यांचे कौतुक करावे व त्यांना प्रोत्साहित करावे त्यांची पाठराखण करावी. • मुलांचे विषय शिक्षक, वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक यांना पालकांनी नियमित भेटायला हवे. • दिनचर्या आखणे, नियोजन करणे, वेळापत्रक तयार करणे, वेळापत्रकाची अंमलबजावणी करणे, मार्गदर्शन करणे यांसारख्या बाबींसाठी पालक आपल्या पाल्यांना मदत करू शकतात. • अभ्यास आणि परीक्षेतील यश याबाबत पालकांनी मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत, तसेच आपल्या अपेक्षांचे मुलांच्या मनावर फार ओझे होणार नाही, याचीही काळजी पालकांनी घ्यावी. • मुलांना एखाद्या विषयात आवड कशी निर्माण होईल हे बघणे शिक्षकाचे आणि पालकांचे प्रथम कर्तव्य असते. त्या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांची उत्सुकता जागृत करण्याचे मार्ग आपण खुले करायचे असतात. त्यांना योग्य सुविधा, योग्य परिसर, योग्य वातावरण उपलब्ध करून द्यायचं असतं. आपल्या इच्छा-आकांक्षा त्यांच्यावर लादायच्या नसतात. त्यांच्या आवडीनुसार त्यांना त्यांचे मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. • गणित या विषयाचा अभ्यास करताना मुलांनी सूत्रांची सिद्धता समजून घेतली पाहिजे. ते सूत्र नीट कळले नसेल तर ते तोंडपाठ करून काही फायदा नसतो. गणितातील उदाहरणे, प्रमेय, समस्या मुलांनी स्वतः सोडविल्या पाहिजेत. त्यावर चिकित्सक पद्धतीने चिंतन केले पाहिजे. सिद्धतेवर स्वतः नवीन पर्याय व मार्ग शोधले पाहिजेत. • विज्ञान विषयाचा अभ्यास हा प्रयोग, निरीक्षण, विश्लेषण, आकृत्या, तुलना-विरोध-साम्य-स्पष्टीकरण अशा टप्प्यांनी करावयाचा असतो. मुलांना स्वयंअध्ययन आणि स्वयंमूल्यमापनाचे तंत्र जमले पाहिजे. • सामाजिकशास्त्रांचा अभ्यास करताना मुलांनी नकाशा, चित्रे, संदर्भ ग्रंथ, इतर पूरक पुस्तके, वर्तमानपत्रातील लेख यांचा उपयोग करून स्वतःच्या नोट्स (टिप्पणी) काढल्या पाहिजेत. • परीक्षेची किंवा एखाद्या विषयाची किंवा विषयातील एखाद्या भागाची भीती वाटत असेल तर त्या भीतीने घाबरून जाऊ नका. घाबरल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. • सारख्या तक्रारी करू नका किंवा परिस्थितीला दोष देत बसू नका. त्याऐवजी आपला वेळ ती समस्या सोडवण्यासाठी खर्च करा. उत्तरे शोधण्याची सवय लागली कि तक्रारी करण्याची नकारात्मक सवय आपोआप कमी होते. • नियमित अभ्यास जसा महत्वाचा आहे, तसा नियमित व्यायाम सुद्धा महत्वाचा आहे. व्यायाम करणे म्हणजे वेळ वाया घालवणे नव्हे. आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राखणे हे आपले कर्तव्यच आहे. • अति विचार करण्यात फार वेळ वाया जातो आणि शक्ती खर्च होते. त्यामुळे नुसताच विचार करण्यापेक्षा कृती करणे नेहमीच श्रेष्ठ असते. आपला मेंदू – जगातला अद्वितीय सुपर कॉम्पुटर – मेंदूचा वापर आपण सगळेच करत असतो. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे, मेंदूच्या संपूर्ण क्षमतेचा वापर कुणीच करत नाही. जगातील अत्यंत बुद्धीमान व्यक्तींनी सुद्धा आपल्या मेंदूचा संपूर्ण वापर केलेला नाही. जसा जसा मेंदूवरील ताण वाढत जातो तसतशी मेंदूची कार्यक्षमता कमीकमी होत जाते आणि मेंदूला थकवा येतो. कुणीतरी आपल्यावर अभ्यास करण्याची सक्ती करत आहे, अशा मानसिकतेमध्ये राहून अभ्यास करायला सुरुवात केली तर आपला मेंदू आपल्याला मदत कशी करेल ? अभ्यास करणे हि माझी गरज आहे, मी अभ्यास केल्याशिवाय माझ्या आयुष्यातील ध्येय साध्य करणे मला कठीण होईल, अशी मानसिकता ठेवली पाहिजे. अभ्यास कमी वेळ करा पण जेवढा कराल तेवढा आनंदाने करा. आपला मेंदू ही आपल्याला मिळालेली खूप मोठी आणि मौल्यवान देणगी आहे. तिचा जास्तीत जास्त वापर करणे हे आपल्या हाती आहे. मेंदू आपली खूप कामे सहजरीत्या करू शकतो. पण जर आपण त्याचा नियमितपणे वापराच केला नाही तर मेंदूच्या क्षमता कमी होतात आणि ऐनवेळी मेंदू आपल्याला साहाय्य करू शकत नाही. अभ्यास किंवा कोणतेही काम सातत्याने केले पाहिजे असे मोठी माणसे आपल्याला सांगतात, त्यामागे हेच कारण असते. आपली बुद्धिमत्ता जरी चांगली असली आणि आपण खूप हुशार आहोत असे आपल्याला वाटले तरीसुद्धा योग्य दिशेने कष्ट केल्याशिवाय यश मिळू शकत नाही, हि गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. आपल्याला बुद्धीला कष्टांची जोड मिळणे अत्यंत आवश्यक असते. अतिशय उत्तम गुलाबाचे झाड चांगल्या प्रतीचे खत आणि नियमितपणे पाणी घातल्याशिवाय जगू शकत नाही, तसेच आपल्या बुद्धीचे आहे. विविध प्रकारची कोडी सोडवत राहणे, शब्दकोडी सोडवणे, चित्र पाहून त्याचे वर्णन करणे, गणितीय कोडी, तुकडे जोडून चित्र तयार करणे, दोन चित्रांमधला फरक ओळखणे, गटात न बसणारा शब्द ओळखणे, एकाच वेळी अनेक गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करणे, अतिशय वेगात आणि अचूक लिहिण्याचा प्रयत्न करणे, अतिशय वेगात आणि अचूक वाचन करण्याचा प्रयत्न करणे, एखाद्या विषयाशी संबंधित असणारे आणि आपल्याला आठवणारे शब्द विशिष्ट वेळात लिहून काढणे, मुद्दे तयार करून त्यावरून गोष्ट लिहिणे किंवा एखाद्या गोष्टीचे लहान लहान मुद्द्यांमध्ये रुपांतर करणे, एकाच वाक्याचे मराठी-हिंदी-इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये भाषांतर करणे अशा क्रिया सतत करत राहिल्याने आपला मेंदू अधिक कार्यक्षम होतो आणि अचूक काम करण्याची सवय लागते, मेंदूच्या विचार करण्याच्या पद्धतीला एक प्रकारची शिस्त लागते. अतिशय शांत वातावरणात, एकाग्र अवस्थेमध्ये, लक्षपूर्वक काम करत राहिल्यास नेहमीच फायदा होतो आणि आपल्या कामाचा प्रभावी परिणाम लवकर दिसून येतो. त्यामुळे कोणतेही काम करताना आपल्या मनामध्ये दुसरे विचार येऊ न देता आणि गडबड गोंधळ न करता शांतपणे काम करत राहणारी माणसे नेहमीच यशस्वी होताना दिसतात, कारण आपल्या मेंदूला नेमके कामाला कसे लावायचे हे त्यांना अगदी व्यवस्थित समजलेले असते. आपल्या मेंदूला उत्तम स्थितीमध्ये ठेवायचे आहे ना ? मग या गोष्टी आचरणात आणायला हव्यात • नियमित आणि वेळच्या वेळी आहार घ्यायला हवा, गरज नसताना उपाशी राहून काहीही फायदा होत नाही. • ताजी फळे खा. • हिरव्या पालेभाज्या, आणि कडधान्ये यांचा समावेश रोजच्या जेवणामध्ये असायला हवा. • पिझ्झा, बर्गर, बेकरीचे पदार्थ,मैदा घातलेले पदार्थ कटाक्षाने टाळायला हवेत. • फ्रीजमध्ये अनेक दिवस ठेवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नये कारण त्याने पोट तर भरते, पण शरीराला पोषक असणाऱ्या गोष्टी मिळू शकत नाहीत. • भरपूर पाणी प्यावे. बऱ्याच व्यक्ती पाणी फारच कमी पितात, त्यांना या सवयीचा पुष्कळ त्रास पुढे सहन करावा लागतो. • बाजारात मिळणारे रेडी टू इट प्रकारचे अन्नपदार्थ मुळीच खाऊ नयेत. • घराचे लोणी, साजूक तूप यांचा आपल्या आहारात समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे. • प्रमाणाबाहेर आहार टाळायला हवा, आणि आवश्यकतेपेक्षा कमी आहार घेणेसुद्धा टाळायला हवे. या दोन्ही गोष्टी सारख्याच प्रमाणात धोकादायक असतात. • चहा-कॉफी, कोल्डकॉफी अशा पदार्थांचे सेवन करणे टाळायला हवे. पाच पायरी अभ्यास पद्धती : पहिली पायरी: निरीक्षण, सर्वेक्षण, पाहणी, ओळख करून घेणे. • ज्या प्रकरणाचा/विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्याचे वाचन करण्यापूर्वी त्याची प्राथमिक ओळख करून घ्यावी. • शीर्षक, मजकुरांचे विभाग-उपविभाग, उपशीर्षके, ठळक मुद्दे, आकृत्या, चित्रे, शब्द, तांत्रिक संज्ञा, व्याख्या, आलेख यांची ओझरती नोंद घेत-घेत त्या प्रकरणाच्या शेवटच्या वाक्यापर्यंत पाहणी करावी, सारांश वाचावा. पायरी दुसरी: प्रश्न निर्माण (Questions) अभ्यास घटक ओझरते चालून झाल्यानंतर: • वर्णन करा, तुलना करा, फरक स्पष्ट करा, रिकाम्या जागा भरा, कारणे सांगा, चूक कि बरोबर ते सांगा अशा प्रश्नांचा विचार करावा. पायरी तिसरी: वाचन (Reading) • मन एकाग्र करून संपूर्ण प्रकरण सविस्तर वाचावे. • वाचताना योग्य जागी खुणा कराव्यात. मुख्य मुद्दे टिपून ठेवावेत. • वाचून झाल्यावर धड्याचा सारांश तक्ता (Summary Chart) लिहावा. पायरी चौथी: मनन (Recalling) • वाचलेला भाग आठवून पाहावा. • आपल्याला किती समजले ते पाहावे. • ठराविक मुद्दे क्रमवार आठवून किती लक्षात राहिले ते तपासून पाहावे. • वर्गात प्रत्येक तासाला काय शिकलो, दिवसभर काय वाचले याचे स्मरण करावे. पायरी पाचवी: उजळणी (Revision) • वाचलेला मजकूर स्मृतीत पक्का करण्यासाठी अधूनमधून पुन्हा वाचणे. • मुख्य मुद्दे, व्याख्या, सूत्रे, सारांश व तक्त्यांवर वारंवार नजर फिरवावी. • विविध अनुभवांतून ज्ञान मिळविण्याने, अनुभवातून शिकल्याने, सखोल विचार केल्याने, कल्पना केल्याने, बदलणाऱ्या परिस्थितीला तोंड दिल्याने, ऐकताना, पाहताना, कृती करताना अर्थ नीट समजून घेतल्याने बुद्धीचा विकास होतो आणि अशा बुद्धीने अभ्यास होतो. • सातत्य आणि सराव या दोन बाबी स्वयंअध्यनासाठी अतिशय आवश्यक आहेत. वाचन, लेखन, आकलन, स्मरण, उपयोजिता या सर्व क्षमतांचा सातत्याने आणि नियमित स्वरुपात वापर केला कि त्या विकसित होतात. परीक्षा जवळ येते तेव्हा – परीक्षा हि आपल्या फायद्याचीच गोष्ट आहे आणि आपल्यासाठीच केलेली आहे. आपल्याला परीक्षा टाळून किंवा परीक्षेपासून लांब जाऊन यश मिळणार नाही. त्यामुळे मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता आणि नकारात्मक विचार न आणता परीक्षेला सामोरे जायला हवे. अभ्यास करणे आणि परीक्षा या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, अभ्यास करताना परीक्षेचा विचार अजिबात करायचा नाही आणि परीक्षा देताना फक्त उत्तम गुण कसे मिळतील यावरच आपले लक्ष केंद्रित करायला हवे. अनेक मुलांची या दोन्ही गोष्टींमध्ये फारच गडबड होते आणि यश मिळत नाही. अभ्यास करताना फक्त उत्तमरित्या अभ्यास करणे आणि पेपर लिहिताना मन एकाग्र करून अतिशय उत्तम आणि अचूक उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करणे हे पथ्य पाळावे, म्हणजे परीक्षा आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींची भीती वाटणार नाही. परीक्षेची तयारी करण्याची अभिनव पद्धत – आपण नेहमी परीक्षेची तयारी कशी करतो? धडा किंवा कविता वाचतो, महत्वाच्या गोष्टींचे पाठांतर करतो आणि धड्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहून काढतो. पुष्कळ प्रमाणात शिक्षकसुद्धा हेच प्रश्न गृहपाठ म्हणून सोडवण्यास सांगतात. त्यामुळे अभ्यास करणे म्हणजे धड्याखालील प्रश्नांची उत्तरे तयार करणे असा समज विद्यार्थ्यांमध्ये झालेला दिसतो. बरोबर ना? हि पद्धत काही प्रमाणात योग्य असली तरी पुरेशी नाही. धड्याखालील प्रश्न हे आपल्याला मार्गदर्शक प्रश्न म्हणून दिलेले असतात. तेच प्रश्न परीक्षेला येतील याची कुठलीही खात्री देता येत नाही आणि त्याच प्रश्नांची उत्तरे घासून घासून तयार केली म्हणजे माझा धडा तयार झाला असेही ठामपणे सांगणे धोक्याचे असते. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.. परीक्षेचा पेपर कसा तयार करायचा ? त्यामध्ये कोणते प्रश्न टाकायचे ? कोणत्या प्रश्नांना महत्व द्यायचे ? याचे संपूर्ण स्वातंत्र्य पेपर सेट करणाऱ्या शिक्षकांना आहे.त्यामुळे शिक्षक त्या विशिष्ट पाठावर आधारित असणारे कोणतेही प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट करू शकतात. मग अभ्यास करताना कुठलीतरी नमुना प्रश्नपत्रिका मिळवून त्यावर आधारित अभ्यास करण्यापेक्षा आपणच का आपली स्वतःची प्रश्नपत्रिका तयार करू नये? हे तंत्र तुमच्यासाठी नवे असले तरी फारच उपयोगाचे ठरणारे आहे. हे तंत्र वापरताना नेमके काय करायचे आहे? ते पहा – धडा नीट वाचून काढा, प्रत्येक ओळ वाचा, अगदी चौकटीमध्ये दिलेली सगळी माहिती वाचा. आता हे पक्के लक्षात असू द्यात कि यापैकी कोणत्याही माहितीवर आधारित प्रश्न पडू शकतो. आणि आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर नीट सोडवता आले पाहिजे. सर्वप्रथम फक्त रिकाम्या जागा भरा या प्रकारचे प्रश्न तयार करा, तुम्हाला शक्य होतील तितके.. धडा जितका मोठा तितके प्रश्न जास्त.. जितके मुद्दे जास्त असतील तितक्या रिकाम्या जागा सुद्धा जास्त असणारच.. आता ती यादी तयार करा. यानंतरचा प्रश्न म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा.. आता काम आणखीनच सोपे आहे. रिकाम्या जागा भरा या तयार करा. जितकी जास्त वाक्ये तितके प्रश्न जास्त.. आता आपण पुढे जाऊया.. व्याख्या लिहा.. प्रत्येक व्याख्येवर आधारित व्याख्या लिहा हा प्रश्न तयार होईल. झाले कि नाही काम ? आता अनुक्रमे थोडक्यात उत्तरे लिहा आणि सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नांची यादी केली कि झाला तुमचा पेपर तयार. माझ्या पालक मित्रांनो, हे मात्र जरूर लक्षात घ्या.. • अभ्यासक्रमातील एखादा विषय अवघड वाटत असेल तर, तो टाळण्याऐवजी त्या विषयाचा सतत पिच्छा पुरवावा. सतत पिच्छा पुरविल्यामुळे तो विषय सोपा वाटायला लागतो. • ठराविक इयत्तेतील अभ्यास त्याच इयत्तेत मुलांना समजणे व येणे अतिशय महत्त्वाचे आहे. पाहिली ते चौथीच्या प्राथमिक शिक्षणात गणित, इंग्रजी, मराठी व इतर विषयांचा पाया पक्का व्हायला हवा. • बरीच मुले सातवी, आठवी इयत्तेत शिकतात; पण त्यांना तिसरी-चौथीचे गणित वा इंग्रजी येत नाही ही वस्तुस्थिती बऱ्याचदा आढळते. मग खूप धडपड करूनही ती मुले सातवी-आठवीत मागेच पडतात. पर्यायाने अपयश येतं. • प्राथमिक शिक्षणात आपण मागे तर पडत नाहीना यासाठी दक्ष राहायला हवे. विशेषतः पालकांनी विशेष सावध राहायला हवे. • गणित, विज्ञान, भाषा या विषयांचा पाया पक्का होण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. • नियमितपणा ही अभ्यासातील महत्त्वाची बाब आहे. अभ्यासातील नियमितपणामुळे ठरलेल्या वेळी अभ्यास करायला मेंदू तयार असतो. कार्यक्षम असतो.

Saturday, July 25, 2015

I am browsing [ zpdigitalschool: भारत निवडणुक आयोग zpdigitalschool.blogspot.com ]. Have a look at it! http://lm.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fzpdigitalschool.blogspot.in%2Fp%2Fblog-page_44.html&h=HAQFs_Znx&s=1
How To Fill Saral Data Information For Maharashtr…: http://youtu.be/_oFfETxRNYo
How To Fill Saral Data For Maharashtra school 35/…: http://youtu.be/BK_VQUa7LdA
How To Fill Saral Data Information For Maharashtr…: http://youtu.be/NK3DGJWa0pM
How To Fill Saral Data For Maharashtra school 23/…: http://youtu.be/cEtGMnKt708
How To Fill Saral Data Information For Maharashtr…: http://youtu.be/NK3DGJWa0pM
How To Fill Saral Data Information For Maharashtr…: http://youtu.be/_oFfETxRNYo
How To Fill Saral Data Information For Maharashtr…: http://youtu.be/_oFfETxRNYo
How To Fill Saral Data For Maharashtra school 20/…: http://youtu.be/f_fC2knfAlU
How To Fill Saral Data For Maharashtra school 32/…: http://youtu.be/VHe8PfYDuec
How To Fill Saral Data For Maharashtra 02/81: http://youtu.be/Cm_9XmLCD5E
How To Fill Saral Data Information For Maharashtr…: http://youtu.be/lXcEl4CGNQU
How To Fill Saral Data Information For Maharashtr…: http://youtu.be/fF2EFARfWdI
How To Fill Saral Data For Maharashtra school 34/…: http://youtu.be/CE6Pww1v3A8
How To Fill Saral Data Information For Maharashtr…: http://youtu.be/lXcEl4CGNQU

Friday, July 24, 2015

Only. Gr

I am browsing [शासन निर्णय - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत]. Have a look at it! https://www.maharashtra.gov.in/site/common/governmentresolutions.aspx
Share image
I am browsing [Tips to score good marks in board exams?]. Have a look at it! http://entrance-exam.net/forum/general-discussion/tips-score-good-marks-board-exams-629281.html
I am browsing [Tricks to score good marks in board exams? I am a student of class 12th]. Have a look at it! http://entrance-exam.net/forum/general-discussion/tricks-score-good-marks-board-exams-i-am-student-class-12th-686698.html
I am browsing [Other Resources]. Have a look at it! http://www.englishleap.com/other-resources
I am browsing [Std. 12 English - Yuvakbharati - Target Publications]. Have a look at it! https://www.google.co.in/url?q=http://www.targetpublications.org/download/hsc-maharashtra-board/std-12-english-yuvakbharati.pdf&sa=U&ved=0CB8QFjAIahUKEwjYsfvSmfXGAhULGpQKHUIIBr0&sig2=GckdKmApeUFxtEQQFVdrag&usg=AFQjCNGKUALAJElQymlAEU04IcLBlj03tw
I am browsing [Download English grammar lessons, for free, in the PDF format]. Have a look at it! http://www.englishgrammar.org/lessons/
I am browsing [3:28 Degree of Comparison (grammar) Lecture by Ms. Jyotsna Saini. Guru Kpo 5,855 views ]. Have a look at it! https://m.youtube.com/watch?v=IcJZJhUJA4o&itct=CBgQpDAYBCITCIqLzp2a9cYCFQh-fgodjscKZDIHcmVsYXRlZEjCx9iHxbqe0Aw%3D
I am browsing [9:03 English Grammar - Direct And Indirect Speech Open School 153,325 views ]. Have a look at it! https://m.youtube.com/watch?v=iLFnXNMnBLI&itct=CCEQpDAYASITCIqLzp2a9cYCFQh-fgodjscKZDIHcmVsYXRlZEjCx9iHxbqe0Aw%3D
I am browsing [STD 12 :Rapid Reading Based Dialogue Writing. › Read the extract and write a short piece of dialogue between Charles and Oliver. Fredrick had a very famous wrestler................to d... ]. Have a look at it! http://englishwithmahure.blogspot.in/2015/02/rapid-reading-based-dialogue-writing.html?m=1
I am browsing [Find Errors and Correct the Sentences › 1. The patient died before the doctor arrived. 2. I have passed the M. A. in 1992. 3. Every chair and every table in the room were in o... ]. Have a look at it! http://englishwithmahure.blogspot.in/2015/02/find-errors-and-correct-sentences.html?m=1
I am browsing [HSC 2015 grammar questions › Grammar Questions of HSSC Exam 2015 (5)Rewrite the following sentences in the ways instructed. (i)When I saw the prizes,I was stupefi... ]. Have a look at it! http://englishwithmahure.blogspot.in/2015/02/hsc-2015-grammar-questions.html?m=1
I am browsing [Rewrite in the ways instructed › 1 We can accept our life gracefully.(Rewrite it using the modal auxiliary showing compulsion ) 2 Chaitanya offered to buy the tickets... ]. Have a look at it! http://englishwithmahure.blogspot.in/2015/02/rewrite-in-ways-instructed.html?m=1

The difference between good employees and great employees is not always something you can put a finger on. If they’re a pleasure to work with, why? If they exceed every expectation, what are their secrets? The answer is as common as ever: interpersonal skills. But because these are technically “soft skills,” which means the best way to attain them is to be born with them, they are extremely valuable and require unique methods to learn. Following is a list of the most important interpersonal skills an employee can possess. Start developing yours today with these 7 tools to immediately improve your ability to communicate tactfully. 1. Verbal Communication Yes, as opposed to non-verbal communication, which we’ll address next. Within verbal communication there are a number of other skills that we’ll talk about later, too, such as listening and questioning, but for now we are primarily concerned with effective speaking. Effective verbal communication begins with clarity. This often requires nothing more than slowing down and speaking more thoughtfully. Many people feel rushed to respond to questions and conversations immediately, but it is better to pause for a moment in consideration, especially if the question merits it. No one expects, or wants, a gun-slinging attitude in important conversations. A thoughtful person is generally taken more seriously. Rounding off this skill is the ability to stay calm, focused, polite, interested and to match the mood or emotion of the situation. If this sounds like an overwhelming task, check out this communication course that teaches you to speak smoothly, clearly and confidently. 2. Non-Verbal Communication Non-verbal communication is largely underrated and underestimated. Those who can communicate non-verbally can almost subliminally reinforce what they are saying verbally. They can also exude confidence, or any other emotion they feel, not to mention respond tactfully to a conversation without saying a single word. Non-verbal communication is something that other people notice whether you are aware of your actions or not. Your body language is constantly speaking. Everything you do or don’t do says something about you and how you are feeling. Your facial expressions (especially eye contact), your posture, your voice, your gestures with your extremities and even the way you position yourself physically in a room or amongst colleagues is constantly revealing your true attitude, for better or for worse. While controlling body language is no easy task, with this five-star course you can learn how to interpret the body language of others while learning how to perfect your own non-verbal communication skills. 3. Listening This is the only appropriate way to follow two topics on communication. If non-verbal communication is underrated, then listening isn’t even on the charts. And yet without listening effectively, how can we interpret and respond appropriately? Even the best communicators can talk their way into a sticky situation. Read this Forbes article on why most leaders need to shut up and listen. It provides explanations on why listening is crucial to success and for tips on becoming a better listener. Listening is so important that it is a bona fide field of theoretical study (a contradiction of terms, but still). Communication can not be realized unless a listener completes the “loop.” Take a look at this blog post on the elements of communication to learn more about how this works. 4. Questioning Questioning is a lost art that can serve many purposes. Questioning is something that often builds upon listening, but it is not merely a device for obtaining information. Questioning is a great way to initiate a conversation. It demonstrates interest and can instantaneously draw someone into your desire to listen. Smart questions show that you know how to approach problems and how to get the answers you need. Fortunately, questioning can be learned more easily than other skills

I am browsing [तालुकास्तर क्रीडा स्पर्धा आयोजक बैठक २०१५-१६ › ]. Have a look at it! http://sataradso.blogspot.in/2015/07/blog-post_24.html?m=1

Vaduj

[24/07 9:19 pm] Rautp.blogspot.in: विण्डोजप्रेमींसाठी खुशखबर म्हणजे लवकरच विण्डोज टेन येत आहे. अर्थात मायक्रोसॉफ्टने विण्डोज टेनचे डेमो व्हर्जन लोकांना उपलब्ध करून दिल्यामुळे टेनचे साधारण स्वरूप कसे असेल याचा अंदाज लोकांना आला असला तरीही विण्डोज टेनबाबत उत्सुकताही तेवढीच आहे. आता अवघ्या काही दिवसांतच म्हणजेच २९ जुलै रोजी मायक्रोसॉफ्ट विण्डोजचे नवीन रूप जगासमोर आणणार आहे ते म्हणजे विण्डोज टेन. जगभरात घरोघरी विण्डोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जात असल्यामुळे विण्डोजच्या नवीन व्हर्जनबद्दल साऱ्या जगात उत्सुकता आहे. अर्थातच विण्डोज टेनचे डेमो व्हर्जन लोकांना खुद्द मायक्रोसॉफ्टने उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकांना विण्डोज टेनचे साधारण स्वरूप कसे असेल, याबाबत अंदाज आलाच आहे. कोर्टाना : अ‍ॅपलने काही वर्षांपूर्वी आयफोन फोर एस बाजारात आणला होता. त्यामध्ये सीरी नावाचे पर्सनल असिस्टंट अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले होते. त्या काळी त्याची खूप चर्चाही झाली. आता त्याच धर्तीवर आधारित असे कोर्टाना नावाचे पर्सनल असिस्टंट अ‍ॅप्लिकेशन विण्डोज टेनसोबत आपल्याला उपलब्ध होणार आहे. हे अ‍ॅप्लिकेशन विण्डोज फोन एटवर चालणाऱ्या मोबाइलधारकांना नवीन नाही. पर्सनल असिस्टंट अ‍ॅप्लिकेशन म्हणजे आपण या कोर्टानाला प्रश्न विचारायचे आणि ती आपल्याला योग्य उत्तर देते. समजा, तुम्ही तिला सांगितले की, कोर्टाना, टेल मी अ जोक- की तुमचे वेब ब्राउजर वापरून हे अ‍ॅप्लिकेशन जोक शोधून काढेल आणि तुम्हाला तो वाचून दाखवेल. याच अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून आपण आपल्या मीटिंग्जचे टाइम, अलार्म म्हणून साठवू शकता कुणालाही ठरावीक वेळेत ई-मेल पाठवू शकता, इत्यादी. आता ही कोर्टाना सीरीपेक्षा उपयुक्त ठरेल की नाही हे काही काळातच कळेल. परंतु मध्यंतरीच्या काळात व्हॉइस डिटेक्शन टेक्नॉलॉजीमध्ये बरेच काम झाले आहे, त्यामुळे याचे रिझल्ट सीरीपेक्षा लाभदायक ठरतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. हे कोर्टाना अ‍ॅप्लिकेशन आपल्या होम स्क्रीनवर खाली सर्च बॉक्सच्या स्वरूपात उपलब्ध असेल. त्यामुळे आता सर्च करण्यासाठीचा सर्च बॅक्स आपल्याला स्टार्ट मेन्यूमध्ये पूर्वीसारखा शोधावा लागणार नाही. व्हच्र्युअल डेस्कटॉप : आताच्या विण्डोजमध्ये एक बाब म्हणजे व्हच्र्युअल डेस्कटॉप आपण जर एकाच वेळी अनेक अ‍ॅप्लिकेशन्सवर काम करत आहात आणि आपल्याला एका अ‍ॅप्लिकेशनवरून दुसऱ्या अ‍ॅप्लिकेशनवर जायचे असेल तर आपण ं’३ +३ुं वापरून शिफ्ट करू शकतो किंवा टास्कबारवर शोधून त्याद्वारे अ‍ॅक्सेस करू शकतो, परंतु आता यामध्ये आपल्याला व्हच्र्युअल डेस्कटॉप विण्डोज आणि टॅब बटन वापरून आपण टास्क व्ह्य़ूवर जाऊ शकता. आपल्या सोयीसाठी आपण अ‍ॅण्ड डेस्कटॉप बटणाचा वापर करून एका नवीन डेस्कटॉप स्क्रीनवर चालू अ‍ॅप साठवू शकता आणि गरज लागली की सहज अक्सेसही करू शकता. एज ब्राउजर : विण्डोज टेनमध्ये आपल्याला मिळणारे आणि एक महत्त्वाचे फीचर म्हणजे यात असणारे नवीन ब्राउजर इंटरनेट एक्स्प्लोरर आपणा सर्वाच्या परिचयाचे आहे, पण एक नवीन फीचरसह असणारे ब्राउजर विण्डोज टेन आपल्याला उपलब्ध करून देणार ते म्हणजे एज ब्राउजर यामध्ये असणाऱ्या काही फीचर्सपैकी एक म्हणजे रीिडग मोड आपण इंटरनेटवर एखादी महत्त्वाची माहिती वाचत असाल तर या रीडिंग मोडमध्ये बाकी स्क्रीन अ‍ॅनिमेशन ऑफ होते आणि आपल्याला वाचावयाचा कंटेण्ट आपण सहजतेने वाचू शकतो. शिवाय आपल्याला एखादी माहिती कुणाला सेंड करायची असेल तर त्यातील ठरावीक भाग आपण आपल्या सोयीने हायलाइटदेखील करू शकतो, यामुळेच मोझीला आणि क्रोमपेक्षा हे ब्राउजर उत्तम ठरू शकेल, अशी आशा मायक्रोसॉफ्टला वाटत आहे. इनबिल्ट अ‍ॅप्स : आपल्याला या विण्डोज टेनसोबत मिळणारी उत्तम बाब म्हणजे इनबिल्ट अ‍ॅप्लिकेशन्स. विण्डोज टेनसोबत आपल्याला स्काइप प्री-इनस्टॉल्ड असते, ज्यामुळे आपल्याला व्हिडीओकॉल्स करणे सोयीचे होते. याखेरीज गुगलच्या स्ट्रीट व्ह्य़ूला उत्तर म्हणून मायक्रोसॉफ्टने स्ट्रीटसाइड अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे, तसेच सर्व प्रकारच्या नोट्ससाठी वन नोट अ‍ॅप्लिकेशनही आपल्याला उपलब्ध होते. मायक्रोसॉफ्टच्या वन ड्राइव्ह आपण क्लाउड स्टोअरेज म्हणून वापरत असाल तर त्याच्याच विविध अ‍ॅप्लिकेशनद्वारे कोणत्याही डिव्हाइसवरून आपण डेटा सहज अ‍ॅक्सेस करू शकता यासाठीदेखील फोटो व्हय़ूअर आणि म्युझिक अ‍ॅप आपणांस मदतगार ठरतात. विण्डोज टेनसाठी कुणासाठी मोफत? - विण्डोज सेव्हन आणि एट, एट पॉइंट वन वापरणाऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्ट विण्डोज टेनचे अपडेट मोफत उपलब्ध करून देणार आहे, त्यासाठी आपल्याला आपल्या डिव्हाइसवरून मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर अपडेटसाठी रजिस्टर करावे लागणार आहे. - ४ इंच ते ८० इंचाच्या सर्व विण्डोज डिव्हाइसेससाठी विण्डोज टेन उपलब्ध होऊ शकणार आहे. वरील सर्व फीचर्स हे विण्डोजने उपलब्ध करून दिलेल्या डेमो व्हर्जनमधील आहेत. मुळात २९ तारखेला विण्डोज लाँच झ [24/07 11:38 pm] mdm: एक छोटीशी गोष्ट विचार करायला भाग पाडेल...... एक श्रीमंत बाई साड्यांच्या दुकानात जाते. सर्व भारी भारी साड्यांची खरेदी झाल्यावर दुकानदाराला म्हणते, मला एक स्वस्तातली साडी द्या. मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला द्यायची आहे. बाई साड्या घेऊन निघून जाते. थोड्या वेळाने दुकानात एक गरीब बाई येते.ती दुकानदाराला म्हणते मला एक एकदम भारी साडी द्या, मला माझ्या मालकिणीला द्यायची आहे. तिच्या मुलाच्या लग्नात.......!! . . कोण आहे खरे श्रीमंत??? शुभ रात्रि [25/07 4:41 am] Rautp.blogspot.in: Jul 25, 2015 विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील अवाढव्य खर्च कमी करण्यासाठी गट अ ते गट ड अशा सर्वच संवर्गातील २५ ते ५० टक्के रिक्त पदे भरण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व जिल्हा निवड समित्यांकडे पदभरतीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांचाही फेरविचार करावा, असे सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना व कार्यालयांना कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत अत्यावश्यक पदे भरण्यासाठी सचिव समितीची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. नवीन नोकरभरतीवर या आधीच पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्याला मिळणारा एकूण महसूल व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च यात व्यस्त प्रमाण आहे. आर्थिक स्थैर्य राखायचे असेल तर, महसूलवाढीच्या दरापेक्षा वेतनवाढीचा खर्च जास्त असू नये, असे वित्त विभागाचे म्हणणे आहे. त्यानुसार वित्त विभागाने २ जून २०१५ रोजी एक आदेश काढून नवीन पदनिर्मिती व पदभरतीवर बंदी घातली आहे. त्यातून सिडको, एमएमआरडीए, पुणे महानगर विकास प्राधिकरण, नागपूर सुधार न्यास (एनआयटी) अशा काही आर्थिकदृष्टय़ा सक्षम असलेल्या संस्थांना वगळण्यात आले आहे. शासकीय सेवेतील पदे लोकसेवा आयोग व जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यात येतात. या संस्थांमार्फत १६ जुलै २०१५ पर्यंत मागणीपत्र, निवड झालेल्या उमेदवारांच्या शिफारशी, नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणे, या स्तरावर भरती प्रक्रिया असेल, तर ती पूर्ण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु ज्या विभागांनी २ जून २०१५ पूर्वी निवड समित्या व लोकसेवा आयोगाकडे पद भरतीची मागणीपत्रे सादर केली आहेत, परंतु १६ जुलै २०१५ पर्यंत त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केलेली नसेल, तर संबंधित विभागांनी त्या प्रस्तांवाचा फेरविचार करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वित्त विभागाच्या सूचना वित्त विभागाच्या सूचनांनुसार सामान्य प्रशासन विभागाने १६ जुलै रोजी एक आदेश काढून रिक्त पदे भरण्यावरही काही प्रमाणात र्निबध आणले आहेत. शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य परिचारिका, पशुधन परिवेक्षक, मत्स्यव्यवसाय विभागाचे तालुका स्तरावरील अधिकारी, वनरक्षक, कृषी साहाय्यक, पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता या संवर्गातील रिक्तपदांपैकी ७५ टक्के पदे भरण्यास मुभा राहणार आहे. त्याचबरोबर इतर संवर्गातील सरळसेवा कोटय़ातील रिक्त असणाऱ्या पदांपैकी ५० टक्के किंवा एकूण पदांच्या ४ टक्के जागा भरण्यास मान्यता मिळणार आहे [25/07 4:45 am] Rautp.blogspot.in: रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो., तसेच, आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो.. प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची 'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो.. कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही [25/07 4:48 am] Rautp.blogspot.in: How does blood type diet work? D’Adamo says that ever individual has its own way of responding to foods, which is connected to the blood type. According him, lectins, or carbohydrate-binding proteins, attach to different blood type in a different way. The reaction between lectins and blood types can sometimes harm health. The doctor explained certain changes and side-effects in his book, but his main goal was to analyze which food are suitable for each blood type, and of course, the amount in which they should be consumed. Four basic blood types 1. Blood type A 20,000 years ago, in the developing stage of agriculture, this blood type went through the change of a lifetime. People with this blood type should be vegetarians, and they are also referred to as “the agrarians.” People with blood type A should avoid meat, and eat more fruits, veggies, beans, legumes and whole grains. In other words, organic and fresh foods are the real deal for these people, because they have a sensitive immunity. 2. Blood type O Dating since 30,000 years ago, this is the oldest blood type. Unlike other blood types, it requires protein-high nutrition. These are “the hunters.” People with blood type 0 should eat protein-loaded foods, including lean meat, poultry, fish and vegetables. They should avoid grains, beans and dairy products. To treat stomach ache and other health problems these individuals should take different supplements. 3. Blood type B “The nomads” can adapt to dairy products and have the most versatile digestive tract. This blood type appeared 10,000 years ago. People with blood type B should avoid corn, wheat, buckwheat, lentils, tomatoes, peanuts, and sesame seeds. According to D’Adamo, chicken can also cause some health problems. He recommends consuming large amounts of vegetables, eggs, certain meat and low-fat dairy products. 4. Blood type AB These are “the enigmas,” because this blood type is only 1,000 years ago. As this is the most recently developed type, the diet varies between blood type A and B. People with blood type AB should eat tofu, seafood, dairy, and green vegetables. D’Adamo says that these people struggle with heartburn, and they should avoid caffeine, alcohol, and smoked meat. If you still have not determined your blood type, ask your doctor. Food recommendations for each blood type: Blood type A Foods to eat: vegetables, whole grains (not pasta or bread), berries, figs, avocados, apples and peaches. Nuts and soy are the only proteins allowed. Foods to avoid: any kind of meat, dairy products, and kidney beans. Blood type O Foods to eat: red meat, poultry (chicken, turkey), seafood and other proteins. Speaking of veggies, eat more kale, spinach, kelp and broccoli. Foods to avoid: legumes (beans, peanuts, lentils), dairy products, eggs, wheat and grains. Blood type B Foods to eat: fruits, green vegetables, certain grains, red meat, fish, turkey. Foods to avoid: seeds, chicken, peanuts, lentils, corn, and buckwheat. Blood type AB Foods to eat: turkey, tofu, seafood and fish, vegetables, beans, watermelon, figs, apples, bananas, legumes. Foods to avoid: buckwheat, corn, red meat (causes stomach acid). Be careful when consuming alcohol and caffeine. Organic food is great for all blood types. Ask a nutritionist to help you improve your diet. Food groups are strict, and you do not have to worry about excess calories. Learn more about the positive and negative effect of the food you eat. If the members of your family have different diet, the Atkins diet is the real solution for you as it avoids entire food groups. Nutrition for one blood type fits one person, but it is unsuitable for other. To understand the whole concept, read Dr Adamo’s book. Ask your doctor or nutritionist for an advice, and introduce some healthy changes into your diet. Be careful if you are dealing with a special health condition. Source [25/07 5:04 am] Rautp.blogspot.in: पुढील वर्षी ‘ऑनलाइन’च? Maharashtra Times| Jul 25, 2015, 02.27 AM IST Share 0 पुढील वर्षी ‘ऑनलाइन’च? फोटो शेअर करा म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई यंदाच्या शैक्षणिक वर्षात अकरावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये मुंबई, ठाणे व रायगडमध्ये मिळून तब्बल ३९ हजार ५८७ विद्यार्थ्यांचा प्रवेश हा 'ऑफलाइन' प्रक्रियेने झाल्याची गंभीर दखल मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी घेतली. पुण्यात संपूर्ण प्रवेशप्रक्रिया 'ऑनलाइन' राबवणाऱ्या राज्य सरकारने मुंबईत मात्र, वेगळी भूमिका घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि पुढील वर्षी पूर्ण प्रवेशप्रक्रिया 'ऑनलाइन' पद्धतीनेच करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश शालेय शिक्षण प्रधान सचिवांना दिले. राज्य सरकारने २८ मे २००९च्या 'जीआर'द्वारे सर्व प्रवेश 'ऑनलाइन'नेच करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर शालेय शिक्षण संचालकांनी यावर्षी २७ जानेवारीला घेतलेल्या बैठकीतही ‌अधिकाऱ्यांना 'ऑनलाइन' प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. असे असताना जाणीवपूर्वक 'ऑफलाइन' प्रवेशांना वाव ठेवला जात असल्याचा आक्षेप पुण्यातील याचिकादार वैशाली बाफना यांनी अॅड. सुगंध देशमुख यांच्यामार्फत हायकोर्टाकडे नोंदवला होता. या प्रकरणी हायकोर्टाच्या न्या. नरेश पाटील व न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने आदेश देत, पुढच्या वर्षी 'ऑनलाइन'नेच प्रवेश होण्यासाठी आवश्यक उपाययोजना ठरवण्याचे निर्देश शालेय शिक्षण प्रधान सचिवांना दिले. त्याविषयी ५ ऑगस्टला अहवाल देण्यासही त्यांना सांगण्यात आले आहे. [25/07 5:05 am] Rautp.blogspot.in: यासंदर्भात उपसंचालक भीमराव फडतरे यांनी प्रतिज्ञापत्र करून 'ऑफलाइन'चे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. 'जीआर'नुसार, ऑनलाइन प्रक्रियेनंतर ऑफलाइन प्रवेशांची मुभा सरकारने दिली आहे. तसेच, अंतिम निकालपत्र उशिरा मिळणाऱ्या 'आयजीसीएसई' (इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन) बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठीही ऑफलाइन प्रवेशांना सरकारने (सन २०१०चे पत्र) मुभा दिली आहे. त्याआधारे यंदा १० जुलैला 'ऑफलाइन'बाबतचे पत्र काढल्याचे स्पष्टीकरण फडतरे यांनी प्रतिज्ञापत्रात केले. मात्र, त्याने खंडपीठाचे समाधान झाले नाही. 'आयजीसीएसई' बोर्डाच्या अवघ्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी तुम्ही पूर्ण धोरण कसे बदलता? आणि स्वतःच्याच 'जीआर'च्या उलट कसे वागता?' असे प्रश्न खंडपीठाने उपस्थित केले. पुण्यात सर्व प्रवेश 'ऑनलाइन' होण्यासाठी तीननंतर आणखी दोन फेऱ्या राबवण्याचे ठरवले असताना मुंबईबाबत वेगळी भूमिका घेतल्याबद्दल खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. 'ऑफलाइनमुळे गुणवंत उपेक्षित' अकरावीचे आर्ट्‍स, कॉमर्स, विज्ञान, होम सायन्स, एचएससी व्होकेशनल आणि बायफोकल या शाखांमधील प्रवेश ऑनलाइननेच करण्याचा सरकारचाच २८ मे २००९चा 'जीआर' सुस्पष्ट आहे. असे असूनही मोठ्या संख्येने होणाऱ्या ऑफलाइन प्रवेशांमुळे गुणवान विद्यार्थींना चांगल्या कॉलेजांपासून वंचित रहावे लागत असेल, तर समाजातील गुणवत्तेला अर्थच नाही, असे गंभीर निरीक्षण न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने शुक्रवारच्या सुनावणीत नोंदवले. मुंबई-पुणे शहरात नामांकित कॉलेजांसाठी स्पर्धा असते. या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन प्रक्रिया महत्त्वाची असून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना संधी मिळते. असे असताना मुंबईत जाणीवपूर्वक अशी व्यवस्था झाली आहे की, ऑनलाइनचा तीन फेऱ्यांचा सोपस्कार होतात. त्यानंतर होणाऱ्या ऑफलाइन प्रक्रियेत आपल्याला हव्या त्या कॉलेजमध्ये डोनेशन भरून प्रवेश मिळणार असल्याचे विद्यार्थ्यांना माहिती असल्याने अनेकजण जाणीवपूर्वक ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी होत नाहीत, असे याचिकादारांतर्फे अॅड. सुगंध देशमुख यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणले. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील कॉलेजांत तब्बल ३९,५८७ प्रवेश हे ऑफलाइन झाल्याचे त्यांनी निदर्शनास आण [25/07 5:08 am] Rautp.blogspot.in: आपण जे सतत करू, त्याप्रमाणे आपण घडत जातो. आपली सवयच संबंधित गोष्टीत आपल्याला तरबेज बनवते, असं ग्रीक तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटल यांचं विधान आहे. जग वेगानं बदलत आहे, मात्र काळ कितीही पुढे गेला, तरी आनंद आणि यश मिळविण्याचे मार्ग कालातीत राहणार आहेत. पाहू या कोणते आहेत हे मार्ग... ध्येय हवं डोळ्यासमोर आपल्याला जे मिळवायचं आहे, जे ध्येय आहे, ते कायम डोळ्यांसमोर ठेवा. असं केल्यानं कितीही अडचणी समोर आल्या, तरी ध्येय गाठण्याची प्रेरणा कायम मनात राहिल. यासाठी आपली ध्येयं निश्चित करून ती चक्क कागदावर लिहून काढा. तुम्ही आपलं उद्दिष्ट पूर्ण करत असल्याचं चित्र डोळ्यांसमोर ठेवा. यशप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या बऱ्याच पुस्तकांमध्ये या सवयीवर भर दिलेला दिसतो. आव्हानांना सामोरे जा 'समस्या' हा शब्द सगळीकडून काढून टाकून त्याऐवजी 'आव्हान' हा शब्द वापरा. त्यामुळे तुम्हाला अडचणीची वाटणारी परिस्थिती अचानक संधीमध्ये रूपांतरित होईल. दृष्टिकोनात असा बदल केल्यानं तुमच्यातील गुणांना वाव मिळेल, नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल आणि एखाद्या समस्येवर उत्तर शोधणाऱ्यांमध्ये तुमची गणना होईल. आनंदी माणसं संकटकाळी लपत नाहीत, तर ताठ मानेनं त्याला सामोरं जातात. शांत झोप घर, ऑफिस...या रोजच्या धावपळीमध्ये विश्रांतीही तेवढीच महत्त्वाची आहे. दगदगीनंतर पुरेशी झोप मिळाली नाही, तर त्याचा परिणाम आरोग्यावर निश्चितच होतो. रात्री उशिरापर्यंत जागणं, हे काही जणांना मॉडर्न जीवनशैलीला अनुसरून वाटत असेल; मात्र त्यामुळे तुमच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होऊ शकतो. हे दुष्परिणाम तारुण्य सरल्यानंतर जाणवू लागतात. त्यामुळे रोज रात्रीची किमान आठ तास पुरेशी झोप होईल, याची दक्षता घ्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सुरुवात निश्चितच उत्साहानं होईल. स्वतःच्या क्षमता जाणा आपल्या क्षमता काय आहेत आणि आपण कुठे कमी पडतो, याची पुरेपूर जाणीव असणारे यशस्वी होतात. आत्मविश्वासामुळे तुमची वाटचाल सोपी होईल. रोज भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हालाच सापडतील. पोषाख साजेसा असावा तुमच्या कपड्यांवरून स्वतःबद्दलच्या भावना तयार होतात. त्याप्रमाणे तुमचं वागणंही बदलतं. त्यामुळे स्वच्छ, नीटनेटके, कामाला साजेसे कपडे घाला. त्यामुळे दिवसभर योग्य विचारांनी तुम्ही काम कराल. दिवसभर आपण काय काय काम करणार आहोत, ते ठरवून त्याप्रमाणे पोषाख असू द्या. पहिलं इम्प्रेशन चांगलं पडल्यामुळे कामाच्या ठिकाणीही सकारात्मक परिणाम होईल. नियमित व्यायाम नियमित व्यायाम केल्यानं शरीर सुदृढ राहतंच, शिवाय मेंदूलाही अधिक ऑक्सिजन पुरवठा होतो. व्यायामामुळे आनंददायी हार्मोन्स निर्माण होतात आणि मन ताजंतवानं राहतं. जॉगिंग पार्क असो, जिम असो किंवा टेरेस जसा जमेल तसा व्यायाम आवर्जून केला पाहिजे. वाचन वाढवा वाचनामुळे मनाचं पोषण होतं. सकाळी वृत्तपत्रं वाचा, रात्री झोपण्याआधी एखादं छानसं पुस्तक वाचा, अधूनमधून वेळ मिळेल तसं एखादं मासिक चाळा. असं केल्यानं मेंदूला आणि मनाला चांगला खुराक मिळेल. मनात तेढ ठेवू नका एखाद्याविषयी मनात तेढ ठेवू नका. कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाइकांमध्ये अशी एखादी व्यक्ती असतेच जिच्याशी आपलं पटत नाही. मात्र, मनात तिच्याविषयी तेढ ठेवून स्वतःचा चांगला वेळ खराब करू नका. दुसऱ्याला माफ करण्याची सवय लावून घ्या. त्यामुळे तुम्ही सतत पुढे जात राहाल आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकाल. त्याचप्रमाणे स्वतःवरही चिडू नका, स्वतः केलेल्या चुकांबद्दल स्वतःलाही माफ करा. स्वतःलाही आणखी संधी द्या. प्रेमळ वागणूक हवी प्रेमानं केलेल्या छोट्या छोट्या कृतीही तुमचा दिवस छान करतील. लोकांशी शक्य तेवढं सौजन्यानं वागा. उदा. लिफ्टमधून जाताना दुसऱ्यासाठी दार उघडणं किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांची स्वतःहून विचारपूस करणं [25/07 5:25 am] Rautp.blogspot.in: काहीही म्हणा जेव्हा मनामधे भावना आणि विचार एकमेकांवर येऊन आदळतात तेव्हा सहसा भावनांचाच विजय होतो. पण प्रत्येकवेळा भावना पुढे विवश होऊन चालत नाही. कारण विचार हे तुमच भवितव्य घडवत असतात. म्हणून कधी कधी वेळ प्रसंगी कठोर होऊन विचार करावा लागतो अन भावना माराव्या लागतात. कारण त्यातच खरा विवेक सामावलेला असतो. [25/07 6:18 am] Rautp.blogspot.in: मंगेश दाढे, नागपूर रिक्त पदांच्या समांतर आरक्षणाची शहानिशा करूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) प्रस्ताव पाठवावा, असे स्पष्ट आदेश सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक विभागाला दिले आहेत. राज्यात किती पदे रिक्त आहेत, याचे मागणीपत्र प्रत्येक विभागाला दरवर्षी एमपीएससीकडे सादर करावे लागते. त्यानुसार एमपीएससी वर्ग 'अ', 'ब' आणि 'क' श्रेणीच्या रिक्त जागांसाठी जाह‌िरात प्रसिद्ध करते. पण, अलीकडच्या काळात एमपीएससीला माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबविण्यास अडचणी येतात. वारंवार रिक्त जागा किती, आरक्षण कोणत्या पदांसाठी आहे, याची माहिती एमपीएससीला प्रत्येक विभागाकडून घ्यावी लागते. तरीही, बरीच मंत्रालये कोणत्या पदांसाठी आरक्षण आहे, याची माहिती देण्यास टाळाटाळ आणि विलंब लावतात. त्यामुळे दरवर्षी आखण्यात आलेले एमपीएससीचे वेळापत्रकही विस्कळीत होते. एमपीएससीच्या वेळेची बचत व्हावी, कारभारात गती यावी, वारंवार आरक्षणाची शहानिशा करण्याची वेळ एमपीएससीवर येऊ नये, रिक्त जागांची जाह‌िरात वेळेत प्रसिद्ध व्हावी, यासाठी आरक्षणाची माहिती विविध विभागाकडून व्य‌क्तिशः जाणून घेण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट निर्देशच सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव टिकाराम करपते यांनी प्रत्येक विभागाला दिले आहेत. यातून आगामी काळात एमपीएससीचे वेळापत्रक सुरळीत होईल. शिवाय, एमपीएससीकडे विलंबाने प्राप्त होणारया प्रस्तावावर लवकर निर्णय घेण्यास मदत होण्याची शक्यता आहे. अपंग, महिला, खेळाडू प्रवर्गाचा विचार प्रत्येक विभागात रिक्त पदे आहेत. यात अपंग, महिला आणि खेळाडूंना रिक्त पदांमध्ये आरक्षण देण्यात येते. सामान्य प्रशासन मंत्रालयाकडे प्रत्येक विभागाकडून रिक्त पदांचा अहवाल पाठविण्यात येतो. नमूद आरक्षणानुसार मागणीपत्रात अचूक माहिती नोंदवावी, प्रस्ताव काळजीपूर्वक तपासून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. याची थेट माहिती एमपीएससीला प्रत्येक विभागाने द्यावी, त्यामुळे रिक्त जागांची भरती तातडीने होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

Thursday, July 23, 2015

ज संध्याकाळी मा.शिक्षणमंत्रयांबरोबर झालेल्या बैठकीत सर्व मगण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.संच मान्यतेतील त्रुटी दुर करण्यासाठी दि.28 जुलैला मा. शिक्षण सचिव, आयुक्त व संचालक यांच्या सोबत बैठक घेऊन दि.15 ऑगस्ट पर्यन्त ऑनलाईन संच मान्यता करण्यात येईल,अन्यथा ऑफलाइन पद्धतीने संचमान्यता करण्यात येईल.उपसंचालकांनी मान्यता दिलेल्या पायाभूत पदांवरील शिक्षकांच्या वेतनासाठी तातडीने आर्थिक तरतूद करण्यात येईल,उर्वरित पदांना मान्यतेबाबत उपसंचालकांना सहनुभूतिने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात येतील.आईटी विषयाबाबत व अर्थ खात्याशीसंबंधीत मगण्यांवर अर्थ मंत्रयांबरोबर 15 ऑगस्ट पर्यन्त संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.तसेच इतर मगण्यांवरही 15 ऑगस्ट पर्यन्त निर्णय घेण्याचे आश्वासन मा.मंत्र्यांनी दिले व आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले त्यास प्रतिसाद म्हणून 15 ऑगस्ट पर्यन्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. .. धन्यवाद ! प्रा.अनिल देशमुख. सरचिटणीस,म.रा.क.म.शिक्षक महासंघ.(MFJCTO)

शिक्षण योजनांचे होणार मूल्यमापन Maharashtra Times | Jul 24, 2015, 12.37 AM IST म. टा. प्रतिनिधी, नाशिक शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत असलेल्या योजनांचा लाभ सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या कितपत होतो आहे, हे तपासण्यासाठी या योजनांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय सरकार पातळीवर घेण्यात आला आहे. 'बाह्य यंत्रणेमार्फत सर्व योजनांचे मूल्यमापन करणे' ही योजना राबवून त्याअंतर्गत या विभागातील चालू योजनांचे मूल्यमापन केले जाणार आहे. शाळांमधील सर्व घटकांना केंद्रस्थानी मानून त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची पूर्तता किती प्रमाणात केली जाते, याची शहानिशा करण्याच्या उद्देश योजनांच्या मूल्यमापनामागे आहे. चालू शैक्षणिक वर्षा (२०१५-१६)पासून शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत असलेल्या शाळासंबंधित योजनांचे मूल्यमापन केले जाणार आहे. सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, पंचवार्षिक योजनांतर्गत व राज्य योजनांतर्गत आदी योजना प्रकारांचे यांत मूल्यमापन केले जाणार आहे. या योजनेत समाविष्ट असणाऱ्या खर्चाच्या बाबी योजनेच्या मूळ हेतूशी सुसंगत आहे की नाही, योजनांचा लाभ समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनुसूचित जाती / जमाती, मागासवर्ग, महिला व बालके, अपंग समाजातील इत्यादी घटकांपर्यत किती प्रमाणात पोहोचतात, एखाद्या योजनेचे लाभ समाजातील विशिष्ट घटकाला, वर्गाला, व्यक्तीच्या गटाला होणे अपेक्षित असेल तर त्यांना कितपत लाभ झाला आहे, संबंधित योजनांच्या अंमलबजावणीमुळे संबंधित लाभार्थ्यांच्या व्यक्तिगत, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक जीवनावर होणारा परिणाम, योजना अंमलबजावणीमध्ये क्षेत्रिय कार्यालयाकडून होणारी कार्यवाही त्यांची कार्यक्षमता, तत्परता इत्यादींचे मूल्यमापन या योजनेंतर्गत केले जाणार आहे. या योजनांमुळे शैक्षणिक दर्जात किती प्रमाणात वाढ झाली, याचे मूल्यमापनही यातून केले जाणार आहे. मंत्रालयीन विभाग, इतर क्षेत्रिय कार्यालये तसेच विविध सामाजिक उपक्रमांशी संबंधित कामाचा अनुभव असणाऱ्या नोंदणीकृत संस्थांची निवड मूल्यमापनासाठी केली जाणार आहे. संस्थांसाठी निकष ज्या संस्थेची कमीतकमी दहा वर्षांपूर्वीची असेल व अतिउत्तम असेल अशा संस्थांची निवड यासाठी केली जाणार आहे. याशिवाय या संस्थांच्या कामाचा अनुभव शासकीय व निमशासकीय यंत्रणेशी संबंधित कमीतकमी ५ वर्षांचा असणेही गरजेचे आहे. या संस्थांकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ व साधन सामुग्री, मूल्यमापन करण्याकरिता उपलब्ध असावी. या संस्थांकडे शहरी व निमशहरी तसेच ग्रामीण भागामध्ये काम करण्याची संस्थेची क्षमता असणे आवश्यक आहे

अकरावी 'एमसीव्हीसी' अभ्यासक्रमात बदल राज्य शिक्षण मंडळाची मान्यता नसतानाही उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय पुणे - राज्य शिक्षण मंडळाने तयार केलेल्या व्यावसायिक अकरावीच्या अभ्यासक्रमास (एमसीव्हीसी) सरकारची मान्यता नसताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अभ्यासक्रमास मान्यतेचा शासन निर्णय जारी केला आहे. तो याच वर्षीपासून लागू करण्यास सांगितले आहे. हा अभ्यासक्रम अचानक लादला जात असल्याची टीका व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षकांनी केली आहे. व्यावसायिक अकरावी, बारावीचे नियंत्रण व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय करते. राज्यात सुमारे 950 संस्थांच्या माध्यमातून 30 व्यावसायिक अभ्यासक्रम चालविले जातात. त्याची परीक्षा राज्य बोर्ड घेत असल्याने संचालनालयाच्या मदतीने अभ्यासक्रम तयार करण्याचे कामही बोर्ड करते. त्याला सरकारची मान्यता मिळाल्यानंतर अभ्यासक्रम लागू होतो. या अभ्यासक्रमाला शालेय शिक्षण विभागाची मान्यता मिळण्यापूर्वीच उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाने वेगळा शासन निर्णय जारी केला. त्यामुळे दोन्ही अभ्यासक्रम वेगळे असण्याची शक्‍यता शिक्षकांनी वर्तविली आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तकेही तयार झालेली नाहीत. महाराष्ट्र व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. युगल रायलू म्हणाले, ‘नव्या अभ्यासक्रमास विरोध नाही. मात्र, त्याची घाई केली जात आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण घेऊन तो लागू करायला हवा. उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाने 4 जुलै रोजी उशिरा शासन निर्णय जारी केला. अकरावी, बारावीची परीक्षा बोर्ड घेत असल्याने त्यांनी अभ्यासक्रम बदलाच्या सूचना दिल्या पाहिजेत. त्यांच्याकडून अधिकृत सूचना नाही. याच वर्षी बदल करायचा होता, तर प्रशिक्षणासह पुस्तक निर्मितीचे काम मार्चमध्ये पूर्ण व्हायला हवे होते.‘‘ ‘जुनीच पुस्तके वापरा‘ जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी राजेंद्र घुमे म्हणाले, ‘राष्ट्रीय कौशल्य विकास आराखड्यानुसार गेल्या वर्षी अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय झाला. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे त्याला स्थगिती मिळाली. तोच अभ्यासक्रम या वर्षी लागू होत आहे. पुस्तके छापण्यास दिली असून, दोन महिन्यांत तयार होतील. तोपर्यंत शिक्षकांनी जुन्या पुस्तकांच्या आधारे सामाईक धडे शिकविण्यास सुरवात करावी. व्यावसायिक अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीतून बाजारात आणली जाणार आहेत.‘‘ - नव्या अभ्यासक्रमात पूर्वीचे 30 विषय एकत्र करून 20 विषय केले. - व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 70 हजार. - नवा अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेण्याऐवजी शिक्षकांचे तीन तासांचे प्रबोधन वर्ग. - अकरावीचे वर्ग 15 जुलै रोजी सुरू झाल्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाची अभ्यासक्रम बदलाची कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना. अभ्यासक्रमाला मान्यता नाही राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी व्यावसायिक अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमाला सरकारची मान्यता नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘अभ्यासक्रम तयार करून एप्रिल महिन्यात मान्यतेसाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. त्यांची मान्यता आली नसल्याने शिक्षण संस्थांना अभ्यासक्रम बदलण्यासंबंधी सूचना पाठविलेल्या नाह

शिक्षकांच्या घरभाडे भत्त्याला स्वल्पविराम Maharashtra Times | Jul 21, 2015, 01.30 AM IST म.टा. प्रतिनिधी, नागपूर मुख्यालयी राहत नसल्याचे कारण दाखवीत नागपूर जिल्हा परिषदेने आपल्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता रोखून धरण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील तब्बल ५ हजार शिक्षकांना याचा फटका बसला आहे. शिक्षकांकडून विविध कामे करून घेत असताना त्यांच्या हक्काचे भत्ते कापण्याचा निर्णय अन्यायकारक आहे, अशी टीका शिक्षकांनी केली आहे. याबाबत शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याकडे धाव घेतली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन मुख्यालयी न राहणाऱ्या ‌जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता थांबवून ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे पत्र ‌सर्व विभागांना पाठविले होते. त्यानुसार, शिक्षकांचा जून महिन्यातील घरभाडे भत्ता कापण्यात आला आहे. जुलै महिन्यात देखील ही प्रक्रिया सुरू असून शिक्षकांनी त्याचा निषेध केला आहे. इतरत्र बदल्या केल्यानंतर शिक्षकांची कोणतीही निवासाची व्यवस्था शासनातर्फे केली जात नाही. हा भत्ता मिळणे हा शिक्षकांचा मूलभूत हक्क असल्याचे उच्च न्यायालयानेही सांगितले आहे. शालेय शिक्षकांकडून विविध स्वरूपाची कामे करून घेतली जातात. त्यासाठी त्यांना कोणतेही मानधन दिले जात नाही. ‌शिक्षण विभागाच्या विविध ऑनलाइन कामांसाठीही ‌शिक्षकांना राबविले जाते. हे सगळे करूनही शिक्षकांचे भत्ते कापून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे, अशी तक्रार नंदकुमार यांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे. हक्कभंगाची कारवाई होणार? घरभाडे भत्ता न देण्याच्या निर्णयामुळे शिक्षकांचे २ ते ३ हजार रूपयांचे नुकसान होत आहे. घरभाडे भत्ता बंद केल्यानंतरही जे शिक्षक मुख्यालयी राहणार नाहीत, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई किंवा निलंबन करण्याचे निर्देश असल्याची माहिती आहे. हा सर्व प्रकार म्हणजे शिक्षण विभागाची व लोकप्रतिनिधींची हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. शिक्षकांचे सवाल? मुख्यालयी निवासाची व्यवस्था नाही, मग सक्ती का? पती-पत्नी जि.प.च्या सेवेत असल्यास त्यांनी विभक्त राहायचे काय? होम लोन घेऊन घर बांधले ते कशाकरिता? आर्थिक पिळवणुकीमुळे कामावर परिणाम होत नाही का? वाहतुकीच्या सोयींमुळे अप-डाउन शक्य असताना, निवासाची सक्ती का? मंत्रालयातील कर्मचारी ५० ते १०० किलोमीटरवरून प्रवास करून कामाच्या ठिकाणी पोहचतात. त्यांना घरभाडे भत्ता दिला जातो. शिक्षकदेखील सध्या उपलब्ध असलेल्या वाहतुकीच्या सोयींचा वापर करीत, एवढेच अंतर पार करून शाळेत पोहचतात. आपली कामे ते योग्य प्रकारे पार पाडत आहेत. मग मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी एक न्याय आणि बाहेरील कर्मचाऱ्यांना दुसरा न्याय, असा भेदभाव का? - शरद भांडारकर, सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण ‌शिक्षक-शिक्षकेतर स July 21 at 7:05am · Educational News

शिक्षकांच्या घरभाडे भत्त्याला स्वल्पविराम Maharashtra Times | Jul 21, 2015, 01.30 AM IST म.टा. प्रतिनिधी, नागपूर मुख्यालयी राहत नसल्याचे कारण दाखवीत नागपूर जिल्हा परिषदेने आपल्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता रोखून धरण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील तब्बल ५ हजार शिक्षकांना याचा फटका बसला आहे. शिक्षकांकडून विविध कामे करून घेत असताना त्यांच्या हक्काचे भत्ते कापण्याचा निर्णय अन्यायकारक आहे, अशी टीका शिक्षकांनी केली आहे. याबाबत शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याकडे धाव घेतली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन मुख्यालयी न राहणाऱ्या ‌जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता थांबवून ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे पत्र ‌सर्व विभागांना पाठविले होते. त्यानुसार, शिक्षकांचा जून महिन्यातील घरभाडे भत्ता कापण्यात आला आहे. जुलै महिन्यात देखील ही प्रक्रिया सुरू असून शिक्षकांनी त्याचा निषेध केला आहे. इतरत्र बदल्या केल्यानंतर शिक्षकांची कोणतीही निवासाची व्यवस्था शासनातर्फे केली जात नाही. हा भत्ता मिळणे हा शिक्षकांचा मूलभूत हक्क असल्याचे उच्च न्यायालयानेही सांगितले आहे. शालेय शिक्षकांकडून विविध स्वरूपाची कामे करून घेतली जातात. त्यासाठी त्यांना कोणतेही मानधन दिले जात नाही. ‌शिक्षण विभागाच्या विविध ऑनलाइन कामांसाठीही ‌शिक्षकांना राबविले जाते. हे सगळे करूनही शिक्षकांचे भत्ते कापून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे, अशी तक्रार नंदकुमार यांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे. हक्कभंगाची कारवाई होणार? घरभाडे भत्ता न देण्याच्या निर्णयामुळे शिक्षकांचे २ ते ३ हजार रूपयांचे नुकसान होत आहे. घरभाडे भत्ता बंद केल्यानंतरही जे शिक्षक मुख्यालयी राहणार नाहीत, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई किंवा निलंबन करण्याचे निर्देश असल्याची माहिती आहे. हा सर्व प्रकार म्हणजे शिक्षण विभागाची व लोकप्रतिनिधींची हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. शिक्षकांचे सवाल? मुख्यालयी निवासाची व्यवस्था नाही, मग सक्ती का? पती-पत्नी जि.प.च्या सेवेत असल्यास त्यांनी विभक्त राहायचे काय? होम लोन घेऊन घर बांधले ते कशाकरिता? आर्थिक पिळवणुकीमुळे कामावर परिणाम होत नाही का? वाहतुकीच्या सोयींमुळे अप-डाउन शक्य असताना, निवासाची सक्ती का? मंत्रालयातील कर्मचारी ५० ते १०० किलोमीटरवरून प्रवास करून कामाच्या ठिकाणी पोहचतात. त्यांना घरभाडे भत्ता दिला जातो. शिक्षकदेखील सध्या उपलब्ध असलेल्या वाहतुकीच्या सोयींचा वापर करीत, एवढेच अंतर पार करून शाळेत पोहचतात. आपली कामे ते योग्य प्रकारे पार पाडत आहेत. मग मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी एक न्याय आणि बाहेरील कर्मचाऱ्यांना दुसरा न्याय, असा भेदभाव का? - शरद भांडारकर, सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण ‌शिक्षक-शिक्षकेतर स July 21 at 7:05am · Educational News

आज संध्याकाळी मा.शिक्षणमंत्रयांबरोबर झालेल्या बैठकीत सर्व मगण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.संच मान्यतेतील त्रुटी दुर करण्यासाठी दि.28 जुलैला मा. शिक्षण सचिव, आयुक्त व संचालक यांच्या सोबत बैठक घेऊन दि.15 ऑगस्ट पर्यन्त ऑनलाईन संच मान्यता करण्यात येईल,अन्यथा ऑफलाइन पद्धतीने संचमान्यता करण्यात येईल.उपसंचालकांनी मान्यता दिलेल्या पायाभूत पदांवरील शिक्षकांच्या वेतनासाठी तातडीने आर्थिक तरतूद करण्यात येईल,उर्वरित पदांना मान्यतेबाबत उपसंचालकांना सहनुभूतिने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात येतील.आईटी विषयाबाबत व अर्थ खात्याशीसंबंधीत मगण्यांवर अर्थ मंत्रयांबरोबर 15 ऑगस्ट पर्यन्त संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.तसेच इतर मगण्यांवरही 15 ऑगस्ट पर्यन्त निर्णय घेण्याचे आश्वासन मा.मंत्र्यांनी दिले व आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले त्यास प्रतिसाद म्हणून 15 ऑगस्ट पर्यन्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. .. धन्यवाद ! प्रा.अनिल देशमुख. सरचिटणीस,म.रा.क.म.शिक्षक महासंघ.(MFJCTO)

Tuesday, July 21, 2015

प्रमुख म्हणून विभागीय उपसंचालक हे काम पाहतात. विभागीय कार्यालय, दुय्यम कार्यालये तसेच शिक्षणसंस्था यांच्यात माहितीचे आदानप्रदान सुलभ व वेगवान व्हावे तसेच, कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व सुसूत्रता यावी यासाठी शासनाच्या माहिती तंत्रज्ञानविषयक धोरणास अनुसरून या वेबसाईटची निर्मिती केली आहे. त्याद्वारे मनुष्यबळ, वेळ, इंधन व पैसा यांची मोठ्या प्रमाणावर बचत अपेक्षित आहे. शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभागीय कार्यालय यांची दुय्यम कार्यालये, संलग्न शिक्षणसंस्था यांना या वेबसाईटवरून माहितीचे थेट आदानप्रदान होत आहे. ही माहिती पाहण्यासाठी व डाऊनलोड करून घेण्यासाठी त्यांनी दररोज किमान एकदा या वेबसाईटला भेट द्यावी. श्री.एम.के.गोंधळी शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग कोल्हापूर विभाग एक झलक... ताज्या घडामोडी (लिंकवर क्लिक करा) उच्च माध्यमिक संच मान्यता 2014-15


प्रत्येकाचा स्वभाव असतो वेगळा ,, अबोल,,लाजाळू ,, रागीट ,,बडबडे ,,शांत अशे अनेक प्रकार आहेत स्वभावाचे ,, १) अबोल व्यक्ती न बोलताही खूप काही बोलतो ,, एकच शब्द बोलेल पण सगळ्यांनाच घायाळ करतो … २) लाजाळू व्यक्ती त्याला बोलायचं असत खूप पण ते तो शब्दात नाही मांडू शकत , ते त्याच्या मनातच राहत घुसमटत … ३) रागीट व्यक्ती आपले भाव सगळ्यांच्या पुढे मांडतो कधी ते आवडणारे असतात कधी नाही ,मी स्वताच खरा अस .... ४) बडबडे व्यक्ती फार मजेत असतात नेहमी , ते आपले भाव बोलून मोकळे होतात .... ५) शांत व्यक्ती नम्र पणे सगळ ऐकून मग काय ते प्रेमाने बोलतात ,,व आपलास करतात =बघा तुम्ही कुठल्या स्वभावाचे आहात

SARAL Education maharashtra gov (विद्यार्थी माहिती भरणे) तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तुकड्या व वर्ग तयार करून शिक्षकांचे username व password तयार केल्या नंतर तुम्ही विद्यार्थी माहिती तुमच म्हणजेच शिक्षक login करून विद्यार्थी माहिती भरू शकता. जर मुख्याध्यापकांनी अजून माहिती भरली नसेल तर ती कशी भरावी यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. http://studentssc.blogspot.in/2015/07/saral-education-maharashtra-gov.html (offline data भरण्यासाठी head master login मधून एक्सेल file download करावी .) शाळेच्या मुख्याध्यापकांनी माहिती भरली असेल तर तुमच्या mobile वर username व password येईल तो वापरून तुम्ही विद्यार्थी माहिती भरू शकतो. चला तर विद्यार्थी माहिती कशी भरायची व चुकलेली माहिती कशी दुरुस्त करायची याविषयी माहिती घेऊ. १. आपल्या संगणकाच्या ब्राउजर मध्ये https://rte25admission.maharashtra.gov.in/stud_db/Users/login हि लिंक टाका. त्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. वरील माहिती प्रमाणे login here मध्ये class teacher असे निवडा. username मध्ये तुमच्या mobile वर आलेले username टाका. username हे सुरुवातिचे अंक udise code असेल व नंतर चे तीन अंक serial नंबर असेल. password टाका. captcha image मधील अंक टाका व login या बटनावर क्लिक करा. २. login झाल्यावर आपल्यासमोर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये तीन tab असतील. student entry.(नवीन विद्यार्थी add करणे व माहिती update करणे.) reports. logout. student tab वर माउस न्या लगेच खाली दोन पर्याय दिसतील त्यापैकी New student details या पर्यायावर क्लिक करा. (दुसरा पर्याय हा माहितीत बदल करण्यासाठी आहे.) विद्यार्थी माहिती भरण्याची विंडो आपणासमोर खालील प्रमाणे ओपन होईल. ३.विद्यार्थी माहिती विद्यार्थ्याचे पूर्ण नाव (इंग्रजी मध्ये) विद्यार्थ्याचे पूर्ण नाव मराठीत (नाव चुकीचे आल्यास गुगुल मराठी टूल्स चा वापर करा ) आईचे नाव (इग्रजी व मराठी ) जर पालक माहित नसतील तर not known येथे टिक करावी. आधार कार्ड नंबर किंवा EID आधार कार्ड पावती नंबर ब्लड ग्रुप निवडा लिंग निवडा जन्म तारीख टाका इयत्ता निवडा stream (अकरावी व बारावी साठी ) तुकडी निवडा. medium माध्यम निवडा विद्यार्थी सेमी ला असेल तर yes नसेल तर no CWSN (विशेष गरजा असलेले बालक ) yes or no Religion धर्म निवडा category निवडा cast जात निवडा किंवा type करा. Annual Income (विद्यार्थी BPL धारक असेल तर उत्पन्न १५ हजार पेक्षा कमी असावे) शाळेतील प्रवेश इयत्ता निवडा जनरल रजिस्टर नंबर टाका प्रवेश प्रकार निवडा गत इयत्ता निवडा ग्रेड निवडा ( अ१ , अ२ ,ब१ ,ब२ .....) होस्टेल ला राहतो का ? yes or no निवडा student attendance in school (नियमित असेल तर regular नसेल तर absent more than 30 days ) सर्व माहितीची खात्री करून सेव या बटनावर क्लिक करा ४. save या बटनावर क्लिक केल्यावर माहिती चुकली असेल तर तसा मेसेज दिसेल आणि बरोबर असेल तर माहिती योग्य प्रकारे सेव होईल विद्यार्थ्याचा ID तयार होईल ज्यामध्ये सुरुवातीचे चार अंक हे प्रवेशाचे वर्ष आणि नंतर चे अंक हे तुमचा username असेल त्यामुळे माहिती काळजी पूर्वक भरा. ५. माहिती सेव झाल्यावर address tab वर क्लिक करा. address tab वर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. यामध्ये खालील प्रमाणे माहिती भरा. घर नंबर रस्त्याचे नाव घराशेजारील खुण पिन कोड post राज्य जिल्हा तालुका गावाचे नाव गल्ली / वस्तीचे नाव जर कायमचा पत्ता आणि तात्पुरता पत्ता सारखा असेल तर Is Permanent address same as current address? च्या समोरील yes वर क्लिक करा. नसेल तर नो वर क्लिक करा व address वरील प्रमाणे भरा. 6. Birth Details वर क्लिक करून खालील प्रमाणे माहिती भरा. जन्म तारीख जन्म ठिकाण birth unique id असेल तर देश राज्य जिल्हा तालुका गाव सर्व बरोबर भरल्याची खात्री करा व सेव बटनावर क्लिक करा. ७. आता family व bank details भरण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा. वरील प्रमाणे दिसणाऱ्या tab मधील family tab वर क्लिक करा. खालील प्रमाणे विंडो ओपन होईल यामधील Relationship या नावासमोरील लिस्ट मधून आई , वडील असे जो पर्याय आवश्यक आहे तो निवडून माहिती भरा. ( माहिती भरत असताना पालकाचा मोबाईल नंबर आवश्यक आहे. बहिण किंवा भावाची माहिती भरताना त्याचा /तिचा school id आवश्यक आहे ) सर्व माहिती भरून झाल्यावर सेव बटनावर क्लिक करा ८. बँक details भरण्यासाठी Bank details बटनावर क्लिक करा. आपणासमोर वरील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये account holder relation यामध्ये ज्याचे खाते आहे त्याचे विध्यार्थ्याशी असलेले नाते निवडा . खालील प्रमाणे विंड

Saturday, July 18, 2015

Junior college teachers from Maharastra राज्यात शिक्षकांची हजारोपदे रिक्तमुंबई - शिक्षक-शिक्षकेतरकर्मचाऱ्यांची भरती बंदअसल्याने मुंबईत शिक्षकांच्या820 आणि शिक्षकेतरांच्या600हून अधिक जागा रिक्त आहेत.त्या त्वरित भरण्याचे आदेश उच्चन्यायालयाने दिले, परंतु दोनवर्षांपासून त्या भरलेल्यानाहीत, असा आरोप शिक्षकभारतीचे प्रमुख कार्यवाह सुभाषमोरे यांनी केला आहे.या रिक्त पदांमुळे होणाऱ्याशैक्षणिक नुकसानीस सरकारचेधोरण जबाबदार आहे.शिक्षणमंत्र्यांनी नागपूरअधिवेशनात आश्वासन देऊनहीत्याची अंमलबजावणी केलेलीनाही. या अधिवेशनात निर्णयन झाल्यास तीव्र आंदोलनकरण्यात येईल. त्यासाठीराज्यव्यापी बैठक मुंबईत 26 जुलैरोजी होणार असल्याचीमाहिती मोरे यांनी दिली.आरटीईनुसार विद्यार्थ्यांनागुणवत्तापूर्ण आणि दर्जेदारशिक्षण मिळण्यासाठीविषयनिहाय शिक्षक मिळणेबंधनकारक आहे; मात्र शिक्षकभरतीच्या परवानगीचेसर्वाधिकार शिक्षण आयुक्तांकडेगेल्यामुळे मुंबईत एवढ्या मोठ्याप्रमाणात पदे रिक्त राहिलीआहेत. रात्रशाळांमधील स्थितीतर याहून वाईट आहे. तेथेहीशिक्षकांची पदे रिक्त आहेत; तरशाळांनी विद्यार्थ्यांचेनुकसानहोऊ नये म्हणून नियुक्त केलेल्याशिक्षकांना सरकारी मान्यताआणि वेतनही दिले जात नाहीअशी स्थिती आहे. मुंबईत 150रात्रशाळा आहेत. बहुतांशशाळांमध्ये शिपाई आणि लिपिकनावालाही शिल्लक राहिलेलेनाहीत, असे मोरे यांनीसांगितले.ज्युनिअर कॉलेजच्या 935 मंजूरपायाभूत पदांवरील शिक्षकसातआठ वर्षे विनावेतन कामकरीत आहेत. त्यांच्यानियुक्त्यांना मान्यता मिळूनहीकेवळ तांत्रिक कारणासाठीत्यांचे पगार दिले जात नाहीत.राज्यातही अशीच स्थिती आहे.अक्षरशः हजारो पदे रिक्तआहेत, अशी माहिती मोरे यांनीदिली.


आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली.बैठकीत शासनाने आमच्या मागण्यांवर 21 जुलै पर्यन्त निर्णय न घेतल्यास पुढील प्रमाणे चार टप्प्यात राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. (1)दि.22 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून जिल्हाधिकार्यां मार्फत मा. शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात येईल. (2) दि.24जुलै पासून राज्यातील सर्व 60 हजार क.महाविद्यालयीन शिक्षक काळ्या फिती लावून काम करतील. (3)दि. 28 जुलै रोजीे आझाद मैदान,मुम्बई येथे राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य व मुम्बई विभागातील शिक्षक जेल भरो आंदोलन करतील. (4)दि.1 ऑगस्ट रोजी राज्यातल्या सर्व तालुका तहसिलदार कार्यालयांवर उपोषण करण्यात येईल. तरीही शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर ऑगस्ट मधे पुढील आन्दोलनाबाबत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.. प्रा.अनिल देशमुख.सरचिटणीस,म.रा.क.महाविद्यालयीन शिक्षक महासंघ.(MFJCTO


Junior college teachers from Maharastra Education Post


School - Maharashtra Government School Education and Sports Department. You cannot teach a child any more than you can grow a plant. The plant ... School Education And Sports ... - Shala-school - शालेय शिक्षण व क्रीडा ... education.maharashtra.gov.in/


Inmyschool.in inmyschool.in हि website चालू झाल्यापासून ते आत्तापर्यंत यावरील सर्व सुविधा निशुल्क आहेत ... महत्वाच्या वेबसाईट - सगळ्या चर्चा पहा - माध्यमिक शाळा प्रवेश www.inmyschool.in/


शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर प्रास्ताविक... महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभागाच्या शैक्षणिक व प्रशासकीय ... वेतन व भ.नि.नि. पथक - उच्च माध्य. - माध्यमिक - आस्थापना www.dydekop.org/

777pranav2010@gmail.com

Featured Post

मेजर ध्यानचंद

* Major Dhyan Chand: The Hockey Legend summary of Major Dhyan Chand’s inspirational story for your blog on the occasion of National Sports D...