Saturday, November 23, 2019

*ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे लाभ*

🌷🌻🌷🌻🌷🌻

ब्राह्ममुहूर्त हा ३.४५ ते ५.३०
असा पावणे दोन तासाचा
असतो.
याला रात्रीचा चौथा प्रहर
अथवा उत्तररात्र असेही
म्हणतात.

या काळात अनेक गोष्टी
अशा ‌घडत असतात ज्या
दिवसभराच्या कामासाठी
लागणारी ऊर्जा देत असतात.

या मुहूर्तावर उठल्याने
आपणास एकाच वेळी
अनेक लाभ होतात.

१)  पहिला लाभ म्हणजे
या काळात ओझोन (O३) हा वायू
पृथ्वीच्या वातावरणाच्या
सर्वात खालच्या थरात
जास्त प्रमाणात आलेला
असतो.
या ओझोनमध्ये मानवास
श्वसनासाठी आवश्यक
असणारा प्राणवायू
(आॅक्सिजन) मोठ्या
प्रमाणात असतो.

त्यामुळे या काळात उठून
उजवी नाकपुडी चालू
करून दीर्घ श्वसन केले
असता रक्तशुद्धी होते.

रक्तात प्राणवायूचे प्रमाण
वाढल्याने हिमोग्लोबिन
सुधारते. त्यामुळे ९० टक्के
रोगांपासून मुक्ती मिळते...

२)  दुसरा लाभ असा की
या काळात मंद प्रकाश
असतो. डोळे उघडल्यावर
एकदम लख्ख प्रकाश
डोळ्यावर पडला तर काही
काळ आपणास काहीच
दिसत नाही. असे वारंवार
होत राहिले तर डोळ्यांचे
विकार जडतात व दृष्टी
क्षीण होऊ शकते.

तसे होऊ नये यासाठी  आकाशात तारका असेपर्यंत उठावे.

३)  तिसरा लाभ म्हणजे
या काळात पंचतत्त्वांपैकी
वायुतत्त्व जास्त प्रमाणात
कार्यरत असते व मानवी
शरीरातील अपानवायू
हा कार्यरत असतो.

हा अपानवायू मलनिःसारण
व शरीरशुद्धीचे कार्य करतो.

हा वायू कार्यरत असताना
मल बाहेर टाकण्याचे कार्य
कोणताही यत्न न करिता
सहजतेने होऊ शकते.

कुंथून प्रयत्न करावा लागल्यास
हळूहळू मूळव्याध होण्याची
शक्यता असते. त्यामुळे
मूळव्याध होऊ नये व
उत्तम शरीरशुद्धी व्हावी
यासाठी याच काळात मलनिःसारण करावे.

तसेच जैविक घड्याळाप्रमाणे या काळात मोठ्या आतड्यामध्ये
आपली ऊर्जा कार्यरत असते.

४)  चौथा लाभ म्हणजे
आपल्या शरीरात
दिवसभरात जमा झालेली घाण
नऊ ठिकाणांहून
बाहेर पडत असते.

या नऊ ठिकाणांना
नवद्वार म्हणतात.

दोन डोळे, दोन नाकपुड्या,
दोन कान, एक तोंड, एक
शिश्नद्वार व एक गुदद्वार.

या नऊ ठिकाणी रात्री
शरीरातील घाण जमा होते.
त्या घाणीत अनेक जंतू ,
विषाणू असतात जे रोग
उत्पन्न करू शकतात.

या जंतू , विषाणूंना
सूर्यप्रकाश मिळाल्यास
त्यांची फार मोठ्या
प्रमाणात वाढ होऊ शकते
व आपण रोगास बळी पडू
शकतो.

हे होऊ नये यासाठी
ब्राह्ममुहूर्तावर उठून
ही घाण शरीराबाहेर
काढून टाकली पाहिजे..

५)  पाचवा लाभ म्हणजे
सूर्योदयाच्या आधी
ब्राह्ममुहूर्तावर स्नान
केल्यास त्वचेची रंध्रे
मोकळी होतात.

त्यामुळे शुद्ध हवा आत
शोषली जाऊन सर्व
अवयवांना शुद्ध प्राणवायू
मिळाल्याने संपूर्ण शरीर
दिवसभराच्या कामासाठी
ताजेतवाने होते.

दिवसभर काम केले तरी
आपण एकदम फ्रेश राहतो..

६)  सहावा लाभ म्हणजे
या काळात मेंदूमधील
*स्मरणशक्ती* ची जी केंद्रे असतात
ती जागृत असतात.

या काळात *विद्याअध्ययन*
केल्यास इतर वेळेपेक्षा
जास्त काळ स्मरणात राहते.

तसेच या काळात *ॐकार*
जप केल्यास मेंदूमधील
स्मरणशक्तीची केंद्रे तसेच
इतर शक्ती केंद्रे , नित्य
स्वरूपात जागृत होतात..

७)  सातवा लाभ म्हणजे
सूर्योदयावेळी अनेक
प्रकारच्या आरोग्यदायी
लहरी वातावरणात
सूर्यकिरणांद्वारे
येत असतात.
त्या आपल्या त्वचेद्वारे
शोषल्या जातात
पण त्वचेची रंध्रे मोकळी
असतील तरच.

त्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठून
शरीरशुद्धी केली पाहिजे..

८)  आठवा लाभ म्हणजे
या काळात आपण *ॐकार* साधना केल्यास
*सप्तचक्रे* जागृत होतात,

कारण या मुहूर्तावर
वातावरण शुद्ध असल्याने
जास्त प्रमाणात कंपने
निर्माण होतात व
या कंपनांद्वारे
कुंडलिनी शक्ती जागृती होते..

९)  नववा लाभ म्हणजे
या ब्राह्ममुहूर्तावर
अनेक पुण्यात्मे, सिद्धात्मे
हे परलोकातून पृथ्वीतलावर
आलेले असतात.

या सिद्धात्म्यांना आपण
साधनेद्वारे भेटू शकतो व
उत्तम मार्गदर्शन
मिळवू शकतो.

असे अनेक लाभ
आपण एकाच वेळेस
ब्राह्ममुहूर्तावर उठून
साधना, स्नानादी कर्मे
केल्याने मिळवू शकतो...

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/