Friday, August 7, 2015

[07/08 6:25 pm] Rautp,blogspot,in: उद्याचा उगवणारा दिवस माझा आहे म्हणून जगत असतो, पण उद्याचा दिवस आज म्हणून येतो, तो कालचा झालेला असतो. उद्याचा जन्मणारा बाळ आहे म्हणून तरसत असतो, पण उद्याचा माझा बाळ तरुण म्हणून होतो, तो दुसर्‍याचा झालेला असतो. उद्याची कोमललेली सकाळ आहे म्हणून तरळत असतो, पण उद्याची सकाळ संध्याकाळ म्हणून येते, आणि ती चंद्राची झालेली असते. उद्याचा मुलगा माझा आहे म्हणून वेडावून गेलेला असतो, पण उद्याचा मुलगा जावई म्हणून जातो, तो सासरचा झालेला असतो. उद्याची सोनकळी माझी आहे म्हणून सद्‌गदीत असतो, पण उद्याची सोनकळी सून म्हणून जाते, ती दुसर्‍या घराची झालेली असते. उद्याचा प्रत्येक क्षण माझा आहे म्हणून कंठत असतो, पण उद्याचा क्षण भूतकाळ म्हणून जातो, तो काळाचा झालेला असतो. मी जेव्हा आज मात्र माझा आहे म्हणून स्वतःवर मी पणा गाजवतो, पण आजचा मी हरवलेला म्हणून येतो, तो अहंकारात विलीन झालेला असतो. उद्याचं वाटणारं तारुण्य आहे म्हणून जोशात असतो, पण उद्याचं तारुण्य वार्धक्य म्हणून येतं, आणि तो उद्याचा मी म्हणूनच असतो. [07/08 6:25 pm] Rautp,blogspot,in: बोल माझे अनुभवाचे… गरिबी असली की त्या गरिबीतून आपल्याला खूप काही शिकावयास मिळतं असतं, खूप काही चांगले वाईट अनुभवही येतं असतात. श्रीमंत व्यक्तींना श्रीमंतीतून काही शिकावयास मिळतं असं तरी ते श्रीमंती शिकावयास मिळतं असणार नी अनुभवही तसेच श्रीमंती असणार, यात दुमत असेल असं वाटतं नाही. ज्यांना श्रीमंतीचा गर्व नाही किंवा अहंकार नाही, अशा व्यक्ती श्रीमंत असूनही गरिबांची दु:ख जाणतात, जवळून अनुभवतात. गरिबांना मदत करण्यास सदैव पुढे असतात. मदतीचा वसा त्यांनी घेतलेला असतो. अशा गर्व - अहंकार नसलेल्या श्रीमंतांची मने मोठी असतात याचाच अर्थ श्रीमंती असूनही त्याच्याजवळ मनाची श्रीमंती असते. गरीब असो की श्रीमंत असो, ज्यांच्याकडे मनाची श्रीमंती आहे, अशा व्यक्तींनी या मनाच्या श्रीमंती बरोबर नामस्मरणाची श्रीमंती वाढवावी. परमेश्वरानी आज जे काही आपल्याला दिले आहे, त्यांत सुख समाधान मानून परमेश्वराच्या नावाचा म्हणजेच नामाचा संचय करावयास हवा. हेच नाम किंवा आपण करीत असलेल्या नामस्मरणातून धनाचा संचय जरी होतं नसलं तरी परमेश्वरी नामाचा होतं असलेला संचय हा धन संचयापेक्षा खूप मोठा आहे, अमुल्य असा ठेवा आहे, हा नामाचा केलेला संचय आपल्याला सदैव उपयोगी पडत असतो. म्हणून प्रत्येकांनी नामाची गोडी लावून घेतली पाहिजे, एकदा का नामाची गोडी लागली की आपल्याकडून अखंडपणे नामस्मरण सुरु असते, अगदी चौवीस तास.. ज्या व्यक्ती नामस्मरण करीत आहेत त्यांना क्षणोक्षणी चांगली अनुभूती येतंच असते. पण जर का कुणी अजूनही परमेश्वरी नाम घेतं नसेल किंवा नामस्मरण करीत नसेल अशा व्यक्तींनी त्यांच्या आवडीच्या परमेश्वरचे नाम घ्यावयास सुरुवात करावी, नामाचा संचय करावा. परमेश्वरी अनुभूती आल्यावाचून रहाणार नाही. पहा विचार आणि कृती करून नामात [07/08 6:25 pm] Rautp,blogspot,in: अंधार आहे म्हणून रडत बसलात तर तुमच्या जीवनात उजेड पडण्याची अपेक्षा करू नका, अंधारासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले तरच अंधार दूर होईल [07/08 6:25 pm] Rautp,blogspot,in: युष्याची ङायरी लिहणारा तर तो पांडुरंगच असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खुप काही हव असत, पण पाहिजे तेच भेटत नसत, सर्व काही नशीबात असत, पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत..... परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा

No comments:

Post a Comment

Featured Post

english grammar and practice filphtml book

https://online.fliphtml5.com/ykpcc/xphi/